शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 15:18 IST

गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटकाकलमांच्या फांद्या, पाने करपली; शेतकऱ्यांमध्ये घबराट

सावंतवाडी : गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे येथील भातशेतीसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका काजूबागांना बसला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच हवेतील गारव्याचा परिणाम काजू बागांवर झाला आहे.

काजू कलमांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून पूर्ण वाढ झालेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या बागा करपू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर्षी काजू बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असून शेतकºयांना मात्र मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.अलीकडच्या काळात काजू पीक जिल्ह्याचा आर्थिक कणा बनत चालले आहे. कमी वेळात व कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारी शाश्वत शेती म्हणून काजू पिकाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले होते. परिणामी येथील शेतकऱ्यांसोबत मध्यमवर्गानेदेखील मेहनत व लाखो रुपये खर्च करून हजारो कलमांच्या बागा फुलवल्या आहेत.मात्र, अतिवृष्टीमुळे काजू कलमांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, कलमांच्या फांद्या तसेच पाने अचानक वाळू लागल्याने काजू कलमांचे मळे ओसाड होत चालले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.कृषी विभागाकडे मात्र या रोगावर कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. या संदर्भात निरीक्षण व उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून एक पथक ओटवणे दशक्रोशीत आल्याचे समजते.

मात्र, काजू कलमांना झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावासंदर्भात कोणतीही चर्चा या पथकाने शेतकऱ्यांसोबत केली नाही. तसेच उपाययोजनांसंदर्भात कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या या मुलभूत प्रश्नाकडे शासनकर्त्यांनी लक्ष देण्याची मागणी यानिमित्ताने केली जात आहे.काजू उत्पन्नावर वर्षभराची आर्थिक गणितेकाजू उत्पन्न हे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून काजू उत्पादनातून दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करतो. काजू उत्पन्नावर शेतकऱ्याची वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असतात. मात्र, काजू बागांवर कोसळलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची सर्व आर्थिक गणिते कोलमडणार आहेत. शासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तसेच शेतकऱ्यांना योग्य ती माहिती न दिल्यास येथील काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.काजू कलमे उद्ध्वस्त, शेतकरी हतबलयावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. येथील बागबागायतींसोबत काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पाच ते सहा वर्षे मेहनतीने मोठी केलेली काजू कलमे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने वेळीच लक्ष घालण्याची व उपाययोजना संदर्भात माहिती देण्याची गरज आहे, असे मत काजू बागायतदार विठ्ठल सावंत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग