शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:26 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवालनियमित कर्जदारांवर अन्याय  : एम. के. गावडे

वेंगुर्ला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.वेतोरे येथील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटीतर्फे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभा वेतोरे सोसायटीच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन विजय नाईक, कृषी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी शिवराम गोगटे, संतोष गाडगीळ, प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक, चंद्रकांत वालावलकर, उत्तम वालावलकर, विश्वनाथ गावडे, समीर गोसावी, वर्षा नाईक, गीता गावडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व सभासद उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५००० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. क्यार नावाच्या चक्रीवादळाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. जिल्ह्यातील कापणीस तयार झालेल्या भातपिकाचे जवळपास ६० टक्के पूर्ण नुकसान झाले. भातपिकासोबतच अन्य खरीप पिके, भाजीपाला व कंदवर्गीय पिके या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले.ढगफुटीप्रमाणे अवेळी कोसळणारा पाऊस बागायती पिकांसाठीदेखील कर्दनकाळ ठरला आहे. जानेवारी महिन्याची १०तारीख उजाडली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के आंबा बागायतींना अजून मोहोर आलेला नाही. आता यापुढे जरी हवेत गारठा वाढला तरीही आंब्याचा संपूर्ण हंगाम किमान ५० दिवसांनी पुढे गेला आहे. याचा अर्थ मे अखेरीस आंबा आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल.जूनपासून पुन्हा पावसाची चाहूल लागणार असल्याने आंबा फळे खराब होण्याची भीती दिसत आहे. आंब्यात एक वर्ष आड मोठी फळधारणा होत असल्याने पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा ही झाडे व्यवस्थित फळे देतील याची खात्रीनाही.परतीच्या व अवकाळी पावसामुळे जूनपासून झाडांवर केलेला खर्च पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सहकारास जागत प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र, स्वत:चा दागिना मोडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली. त्यामुळे कर्ज नियमित भरणे हा त्यांनी गुन्हा केला की काय अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे, असेही यावेळी गावडे यांनी सांगितले.सातेरी सोसायटीने उठविला आवाजनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटी वेतोरे या संस्थेने सर्वप्रथम आवाज उठविला आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारी सोसायट्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन सभासदांची बैठक आयोजित करून त्याबाबत योग्य तो ठराव शासनाकडे देण्यात यावा, असे आवाहन वेतोरे सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम वालावलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग