शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:26 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का? शासनाला केला सवालनियमित कर्जदारांवर अन्याय  : एम. के. गावडे

वेंगुर्ला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नियमित कर्जाची परतफेड करीत आलेल्या शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीत नियमित कर्जदारांना बाजूला ठेवण्यात आले आहे. अनेकांनी दागिने विकून, सोने गहाण ठेवून, हात उसने पैसे घेऊन कर्जाचे व्याज भरून कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करून आमची चूक झाली का ? असा सवाल कृषीभूषण एम. के. गावडे यांनी उपस्थित केला.वेतोरे येथील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटीतर्फे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सभा वेतोरे सोसायटीच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन विजय नाईक, कृषी उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी शिवराम गोगटे, संतोष गाडगीळ, प्रगतशील शेतकरी सुशांत नाईक, चंद्रकांत वालावलकर, उत्तम वालावलकर, विश्वनाथ गावडे, समीर गोसावी, वर्षा नाईक, गीता गावडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व सभासद उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी सरासरी ५००० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. क्यार नावाच्या चक्रीवादळाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. जिल्ह्यातील कापणीस तयार झालेल्या भातपिकाचे जवळपास ६० टक्के पूर्ण नुकसान झाले. भातपिकासोबतच अन्य खरीप पिके, भाजीपाला व कंदवर्गीय पिके या सर्वांचेच अतोनात नुकसान झाले.ढगफुटीप्रमाणे अवेळी कोसळणारा पाऊस बागायती पिकांसाठीदेखील कर्दनकाळ ठरला आहे. जानेवारी महिन्याची १०तारीख उजाडली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के आंबा बागायतींना अजून मोहोर आलेला नाही. आता यापुढे जरी हवेत गारठा वाढला तरीही आंब्याचा संपूर्ण हंगाम किमान ५० दिवसांनी पुढे गेला आहे. याचा अर्थ मे अखेरीस आंबा आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल.जूनपासून पुन्हा पावसाची चाहूल लागणार असल्याने आंबा फळे खराब होण्याची भीती दिसत आहे. आंब्यात एक वर्ष आड मोठी फळधारणा होत असल्याने पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा ही झाडे व्यवस्थित फळे देतील याची खात्रीनाही.परतीच्या व अवकाळी पावसामुळे जूनपासून झाडांवर केलेला खर्च पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सहकारास जागत प्रसंगी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र, स्वत:चा दागिना मोडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केली. त्यामुळे कर्ज नियमित भरणे हा त्यांनी गुन्हा केला की काय अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे, असेही यावेळी गावडे यांनी सांगितले.सातेरी सोसायटीने उठविला आवाजनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री देवी सातेरी सहकारी सोसायटी वेतोरे या संस्थेने सर्वप्रथम आवाज उठविला आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारी सोसायट्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन सभासदांची बैठक आयोजित करून त्याबाबत योग्य तो ठराव शासनाकडे देण्यात यावा, असे आवाहन वेतोरे सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम वालावलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग