शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे नुकसान; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST

शेतकरी अडचणीत-पावसाचे सावट :

कडावल : कुसगाव परिसरात वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. होणाऱ्या नुकसानीची पाणी करुन याबाबत वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.  कुसगाव-धांड्याचा पाचा व खडकबाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोर व वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  विशेषत: वनगाई व सांबरांकडून होणारा उपद्रव अधिक आहे. या वन्य प्राण्यांकडून भातपिकाची अतोनात हानी होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. वन्य प्राण्यांबरोबरच मोरांकडूनही पिकाला नुकसानीची झळ बसत आहे. सूर्योदय होऊन कोवळे ऊन पडले, की मोर कळपाने शेतीमध्ये उतरतात व भाताची केसरे तोडून पीक उद्ध्वस्त करतात. येथील मनोहर आचरेकर, गजानन आचरेकर, संभाजी आईर, प्रमोद आचरेकर, गोपाळ वायंगणकर व इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  तालुक्यातील कुसगाव हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला अतिशय दुर्गम भाग आहे. डोंगराळ व जंगलयुक्त परिसर असल्याने येथील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून भातपीक हे ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  वन्य प्राण्यांमुळे येथील शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. वनविभागाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)पावसाचे सावट : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी अडचणीत-दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची टांगती तलवार त्यांच्या डोईवर कायम आहे. येथील शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानटी हत्तींसह डुकरे, माकडे यासारखे वन्य प्राणी भातपीक उद्ध्वस्त करत आहेत. काही ठिकाणी मोरांकडूनही नुकसान होत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत निसर्गाचा असहकार आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत बळीराजा अडकला आहे