शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे नुकसान; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST

शेतकरी अडचणीत-पावसाचे सावट :

कडावल : कुसगाव परिसरात वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. होणाऱ्या नुकसानीची पाणी करुन याबाबत वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.  कुसगाव-धांड्याचा पाचा व खडकबाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोर व वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  विशेषत: वनगाई व सांबरांकडून होणारा उपद्रव अधिक आहे. या वन्य प्राण्यांकडून भातपिकाची अतोनात हानी होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. वन्य प्राण्यांबरोबरच मोरांकडूनही पिकाला नुकसानीची झळ बसत आहे. सूर्योदय होऊन कोवळे ऊन पडले, की मोर कळपाने शेतीमध्ये उतरतात व भाताची केसरे तोडून पीक उद्ध्वस्त करतात. येथील मनोहर आचरेकर, गजानन आचरेकर, संभाजी आईर, प्रमोद आचरेकर, गोपाळ वायंगणकर व इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  तालुक्यातील कुसगाव हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला अतिशय दुर्गम भाग आहे. डोंगराळ व जंगलयुक्त परिसर असल्याने येथील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून भातपीक हे ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.  वन्य प्राण्यांमुळे येथील शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. वनविभागाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)पावसाचे सावट : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी अडचणीत-दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची टांगती तलवार त्यांच्या डोईवर कायम आहे. येथील शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानटी हत्तींसह डुकरे, माकडे यासारखे वन्य प्राणी भातपीक उद्ध्वस्त करत आहेत. काही ठिकाणी मोरांकडूनही नुकसान होत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत निसर्गाचा असहकार आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत बळीराजा अडकला आहे