शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 5, 2023 20:10 IST

मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते.

महेश सरनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग : मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते. त्यामुळे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत असणारे खवय्ये या महिन्यात हमखास आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात करतात. यावर्षी मात्र, परिस्थिती उलट दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात स्वस्त झालेला हापूस मे मध्ये पुन्हा महागला आहे.

तापमान वाढ आणि ऐन बहराच्या हंगामात पडलेला अवकाळी पाऊस या बदलेल्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात बाजारात हापूसच आला नाही. तर आता मे महिन्याच्या सुरुवातीला हंगामातील शेवटचा आंबा बाजारात आला खरा, परंतु हापूसचा दर बिल्कूल कमी झालेला नाही. अद्यापही हापूस आंबा १२०० रुपये डझनने बाजारात येत असल्याने यावर्षी स्थानिकांना हापूसची चव चाखण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागत आहेत.

हापूस हंगाम १५ मे पर्यंत

प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्यावर मोठ्या प्रमाणावर काळे डाग पडले आहेत. शंभर आंब्यामागे ३५ आंबे असे सापडू लागले आहेत आणि ते आंबे फेकून द्यावे लागत आहेत. तर थ्रीप्सच्या (फुलकिडी) आक्रमणापासून पीक वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारण्यांची संख्या वाढली. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. या बदलांमुळे आंबा हंगाम १५ मे पर्यंत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दर पुन्हा १२०० रुपयांवर

यावर्षी मार्च महिन्यात हापूस आवक झाली. त्यावेळी पाच ते सहा डझन पेटीचे दर ८ ते १२ हजार रुपये, तर डझन आंब्याचे दर १००० ते १५०० रुपयांपर्यंत होते. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आणि दर खाली उतरले. पाच ते सात डझनच्या पेटीचे दर ३ ते ६ हजार रुपये, तर एक डझन आंब्याचे दर ८०० ते १२०० रुपये झाले. हापूसची मागणी वाढू लागली आणि आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर पुन्हा वधारून १२०० रुपये डझनापर्यंत पोहोचले आहेत.

बाजारात येताच हातोहात विक्री

आता हापूसचा शेवटचा हंगाम सुरू असून, बाजारात आंबाच नसल्याने असलेल्या आंब्याला प्रचंड मागणी वाढल्याने डझनाचे दर आता १२०० पर्यंत पोहोचले आहेत. कडक उन्हाळा सुरू असल्याने आंबा काढल्यानंतर लगेच दोन दिवसांत तयार होत असल्याने मार्केटमध्ये आलेला आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पावसानंतर कडाक्याचा उष्मा आणि ढगाळ वातावरण सातत्याने आहे. या बदलांमुळे २० ते २५ टक्के इतकेच पीक हाती लागेल. परिणामी हापूसचा दर आता हजाराच्या खाली येणे शक्य नाही. - अयोध्याप्रसाद गावकर, आंबा बागायतदार.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग