शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 5, 2023 20:10 IST

मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते.

महेश सरनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग : मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते. त्यामुळे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत असणारे खवय्ये या महिन्यात हमखास आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात करतात. यावर्षी मात्र, परिस्थिती उलट दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात स्वस्त झालेला हापूस मे मध्ये पुन्हा महागला आहे.

तापमान वाढ आणि ऐन बहराच्या हंगामात पडलेला अवकाळी पाऊस या बदलेल्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात बाजारात हापूसच आला नाही. तर आता मे महिन्याच्या सुरुवातीला हंगामातील शेवटचा आंबा बाजारात आला खरा, परंतु हापूसचा दर बिल्कूल कमी झालेला नाही. अद्यापही हापूस आंबा १२०० रुपये डझनने बाजारात येत असल्याने यावर्षी स्थानिकांना हापूसची चव चाखण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागत आहेत.

हापूस हंगाम १५ मे पर्यंत

प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्यावर मोठ्या प्रमाणावर काळे डाग पडले आहेत. शंभर आंब्यामागे ३५ आंबे असे सापडू लागले आहेत आणि ते आंबे फेकून द्यावे लागत आहेत. तर थ्रीप्सच्या (फुलकिडी) आक्रमणापासून पीक वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारण्यांची संख्या वाढली. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. या बदलांमुळे आंबा हंगाम १५ मे पर्यंत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दर पुन्हा १२०० रुपयांवर

यावर्षी मार्च महिन्यात हापूस आवक झाली. त्यावेळी पाच ते सहा डझन पेटीचे दर ८ ते १२ हजार रुपये, तर डझन आंब्याचे दर १००० ते १५०० रुपयांपर्यंत होते. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आणि दर खाली उतरले. पाच ते सात डझनच्या पेटीचे दर ३ ते ६ हजार रुपये, तर एक डझन आंब्याचे दर ८०० ते १२०० रुपये झाले. हापूसची मागणी वाढू लागली आणि आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर पुन्हा वधारून १२०० रुपये डझनापर्यंत पोहोचले आहेत.

बाजारात येताच हातोहात विक्री

आता हापूसचा शेवटचा हंगाम सुरू असून, बाजारात आंबाच नसल्याने असलेल्या आंब्याला प्रचंड मागणी वाढल्याने डझनाचे दर आता १२०० पर्यंत पोहोचले आहेत. कडक उन्हाळा सुरू असल्याने आंबा काढल्यानंतर लगेच दोन दिवसांत तयार होत असल्याने मार्केटमध्ये आलेला आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पावसानंतर कडाक्याचा उष्मा आणि ढगाळ वातावरण सातत्याने आहे. या बदलांमुळे २० ते २५ टक्के इतकेच पीक हाती लागेल. परिणामी हापूसचा दर आता हजाराच्या खाली येणे शक्य नाही. - अयोध्याप्रसाद गावकर, आंबा बागायतदार.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग