शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हापूसचा दर पुन्हा वधारला; आवक घटली, मागणी वाढली, अद्यापही १२०० रुपये प्रती डझन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 5, 2023 20:10 IST

मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते.

महेश सरनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग : मे महिना आला की आंब्याचे दर खाली उतरायला सुरुवात होते. त्यामुळे दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत असणारे खवय्ये या महिन्यात हमखास आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात करतात. यावर्षी मात्र, परिस्थिती उलट दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात काही प्रमाणात स्वस्त झालेला हापूस मे मध्ये पुन्हा महागला आहे.

तापमान वाढ आणि ऐन बहराच्या हंगामात पडलेला अवकाळी पाऊस या बदलेल्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात बाजारात हापूसच आला नाही. तर आता मे महिन्याच्या सुरुवातीला हंगामातील शेवटचा आंबा बाजारात आला खरा, परंतु हापूसचा दर बिल्कूल कमी झालेला नाही. अद्यापही हापूस आंबा १२०० रुपये डझनने बाजारात येत असल्याने यावर्षी स्थानिकांना हापूसची चव चाखण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागत आहेत.

हापूस हंगाम १५ मे पर्यंत

प्रतिकूल हवामान, बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंब्यावर मोठ्या प्रमाणावर काळे डाग पडले आहेत. शंभर आंब्यामागे ३५ आंबे असे सापडू लागले आहेत आणि ते आंबे फेकून द्यावे लागत आहेत. तर थ्रीप्सच्या (फुलकिडी) आक्रमणापासून पीक वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारण्यांची संख्या वाढली. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. या बदलांमुळे आंबा हंगाम १५ मे पर्यंत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दर पुन्हा १२०० रुपयांवर

यावर्षी मार्च महिन्यात हापूस आवक झाली. त्यावेळी पाच ते सहा डझन पेटीचे दर ८ ते १२ हजार रुपये, तर डझन आंब्याचे दर १००० ते १५०० रुपयांपर्यंत होते. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आणि दर खाली उतरले. पाच ते सात डझनच्या पेटीचे दर ३ ते ६ हजार रुपये, तर एक डझन आंब्याचे दर ८०० ते १२०० रुपये झाले. हापूसची मागणी वाढू लागली आणि आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर पुन्हा वधारून १२०० रुपये डझनापर्यंत पोहोचले आहेत.

बाजारात येताच हातोहात विक्री

आता हापूसचा शेवटचा हंगाम सुरू असून, बाजारात आंबाच नसल्याने असलेल्या आंब्याला प्रचंड मागणी वाढल्याने डझनाचे दर आता १२०० पर्यंत पोहोचले आहेत. कडक उन्हाळा सुरू असल्याने आंबा काढल्यानंतर लगेच दोन दिवसांत तयार होत असल्याने मार्केटमध्ये आलेला आंबा हातोहात संपत आहे.

अवकाळी पावसानंतर कडाक्याचा उष्मा आणि ढगाळ वातावरण सातत्याने आहे. या बदलांमुळे २० ते २५ टक्के इतकेच पीक हाती लागेल. परिणामी हापूसचा दर आता हजाराच्या खाली येणे शक्य नाही. - अयोध्याप्रसाद गावकर, आंबा बागायतदार.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग