शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

By अनंत खं.जाधव | Updated: February 5, 2024 17:32 IST

'भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही'

सावंतवाडी : भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही. ते कृतघ्न आहेत. मी शिवसेनेत स्वतःहून गेलो नाही, त्यांनी  मला आमदार केले नाही, त्यामुळे त्यांनी खोटे बोलू नये. खोके दिले असते तर पुन्हा मला मंत्री केले असते, असा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.सावंतवाडी येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सोमवारी मुंबईतून प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माझा कधीही वैयक्तीक संघर्ष नव्हता. राणेंच्या मागे जिल्हावासियांचे प्रेम आहे. दहशतवाद केव्हाच नव्हता असेही केसरकर म्हणाले.केसरकर म्हणाले, ठाकरे यांच्या बाबत आदर आहे. म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलत नव्हतो. परंतु काल त्यांनी सावंतवाडीत येवून टीका केल्यामुळे मला विरोधात बोलावे लागत आहे. मी साईभक्त आहे. साईंच्या दर्शनाला जातो आणि खुर्चीची उब मिळविण्यासाठी मी सत्तेत गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे. मला आमदार केले असे म्हणणार्‍या ठाकरेंकडे मी कधीही पक्षात घ्या असे सांगण्यासाठी गेलो नाही. भाजपाची आणि विशेषतः मोदींची ऑफर असताना मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी मला निवडून आणले नाही. त्यापुर्वी सुध्दा मी आमदार होतो आणि त्यानंतर सुध्दा मी केवळ सावंतवाडीकरांमुळे आमदार झालो. उलट वैभव नाईकांसह खासदार विनायक राऊत यांना निवडून आणण्यासाठी माझी भूमिका महत्वाची होती. असे ही त्यांनी स्पष्ट केले.माझ्यावर खोके घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा माझ्या पाच पिढ्याची श्रीमंती आहे, हे विसरु नये. मात्र मी खोके आणून देण्यास नकार दिल्यामुळे मला मंत्रीपद नाकारण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांनी कोकणात येवून माझ्यासह राणेंवर आरोप करण्यापेक्षा आपण आज पर्यंत कोकणाला काय दिले? किती जणांना रोजगार दिला? याचे उत्तर द्यावे. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर जिल्ह्यात आलेल्या ठाकरेंच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी कोण धावत नव्हता ही वस्तुस्थिती होती. त्यात राणेंच्या मागे असलेले जिल्हावासीयांचे प्रेम आणि दरारा होता. त्यामुळे किती खोटे बोलावे याचा अभ्यास करावा, असेही मंत्री केसरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरे