शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:44 IST

जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश३७ पैकी ९ गावांची कामे ५० टक्केच पूर्ण, १५ गावांचे १०० टक्के काम

सिंधुदुर्गनगरी : जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्साठी ३७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांनी आराखड्यातील मंजूर कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. ती वाढवून ३१ डिसेंबर २०१८ करण्यात आली होती. तरीही कामे अपूर्ण राहिल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव सु. द. नाईक यांनी आदेश काढत हि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याचे कळविले आहे.जिल्ह्यातील ३७ गावामधील नाडण, धालवली, सौदाळे, नावळे, हरकुळ बुद्रुक, असगणी, तिरवडे, पोखरण, अणाव, सावरवाड, बांदा, कोनशी, दाभिळ, हेवाळे, आयनोडे, घाटीवडे - बांबर्डे या १५ गावांनी १०० कामे पूर्ण केली आहेत. पालांडेवाडी, नाटळ, हळवल, साळेल, कुसबे, पिंगूळी, गिरगाव, कुसगांव, नेरूर तर्फे हवेली, भंडारवाडा, सांगेली, खानयाळे, झोळंबे यांनी ८० टक्के काम पूर्ण केली आहेत. तर कळसुली, भिरवंडे, ओसरगाव, किर्लोस, कुंभारमाठ, आंजीवडे, आडेली, गवाण, चौकुळ या ९ गावांची कामे ५० टक्केच झाली आहेत.२१ फेब्रुवारी २०१९ च्या अहवालानुसार २०१७-१८ मधील जलयुक्त शिवारमध्ये समाविष्ट गावांनी ७०८ पैकी ६२१ कामे पूर्ण केली आहेत. या कामांना १० कोटी ६४ लाख पैकी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाले आहेत. आराखड्यानुसार ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट होते.

पूर्ण झालेल्या कामामुळे यातील ३१६.७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अजून ३.०५ हेक्टर ओलिताखाली येणे शिल्लक राहिले आहे. अपूर्ण राहिलेल्या ८७ कामांना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ३४ कामे प्रगतीपथावर आहेत. निर्मिती पाणीसाठा क्षमता १३०.८० टीसीएम एवढा वाढला आहे. तर यामुळे सिंचनाखाली २८.८५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग