शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

जलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:44 IST

जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश३७ पैकी ९ गावांची कामे ५० टक्केच पूर्ण, १५ गावांचे १०० टक्के काम

सिंधुदुर्गनगरी : जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्साठी ३७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांनी आराखड्यातील मंजूर कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. ती वाढवून ३१ डिसेंबर २०१८ करण्यात आली होती. तरीही कामे अपूर्ण राहिल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव सु. द. नाईक यांनी आदेश काढत हि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याचे कळविले आहे.जिल्ह्यातील ३७ गावामधील नाडण, धालवली, सौदाळे, नावळे, हरकुळ बुद्रुक, असगणी, तिरवडे, पोखरण, अणाव, सावरवाड, बांदा, कोनशी, दाभिळ, हेवाळे, आयनोडे, घाटीवडे - बांबर्डे या १५ गावांनी १०० कामे पूर्ण केली आहेत. पालांडेवाडी, नाटळ, हळवल, साळेल, कुसबे, पिंगूळी, गिरगाव, कुसगांव, नेरूर तर्फे हवेली, भंडारवाडा, सांगेली, खानयाळे, झोळंबे यांनी ८० टक्के काम पूर्ण केली आहेत. तर कळसुली, भिरवंडे, ओसरगाव, किर्लोस, कुंभारमाठ, आंजीवडे, आडेली, गवाण, चौकुळ या ९ गावांची कामे ५० टक्केच झाली आहेत.२१ फेब्रुवारी २०१९ च्या अहवालानुसार २०१७-१८ मधील जलयुक्त शिवारमध्ये समाविष्ट गावांनी ७०८ पैकी ६२१ कामे पूर्ण केली आहेत. या कामांना १० कोटी ६४ लाख पैकी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाले आहेत. आराखड्यानुसार ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट होते.

पूर्ण झालेल्या कामामुळे यातील ३१६.७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अजून ३.०५ हेक्टर ओलिताखाली येणे शिल्लक राहिले आहे. अपूर्ण राहिलेल्या ८७ कामांना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ३४ कामे प्रगतीपथावर आहेत. निर्मिती पाणीसाठा क्षमता १३०.८० टीसीएम एवढा वाढला आहे. तर यामुळे सिंचनाखाली २८.८५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग