शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

शासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:08 IST

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.

ठळक मुद्देशासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप प्रत्यक्ष पाहणीत आढळले कीड लागलेले धान्य

कणकवली : कलमठ येथे सुरू असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चुकीच्या पद्धतीने हरकुळ बुद्रुक येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार वसतिगृहाचे अधीक्षक व कर्मचारी करीत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत समोर आली आहे.

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहाच्या पाहणीनंतर कणकवली पंचायत समितीच्या सभापती दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, शामसुंदर दळवी, पंचायत समिती अधीक्षक अनिल चव्हाण, पालकर व अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.दिलीप तळेकर म्हणाले, कणकवली पंचायत समिती सदस्य गणेश तांबे यांनी या शासकीय वसतिगृहातील समस्येबाबत माहिती मागविली होती. त्याबाबत त्यांना अधीक्षकांनी दिलेली माहिती खरी आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अचानक गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांना घेऊन वसतिगृहाला भेट दिली. या भेटीत वसतिगृह अधीक्षक यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली.या वसतिगृहात सहा कर्मचारी असून त्यापैकी १ कर्मचारी सुट्टीवर होता. तर चार कर्मचारी हजेरीपटावर सही करून गायब होते. फक्त वसतिगृह अधीक्षक एस. पी. जाधव उपस्थित होते. संबंधित वसतिगृहाच्या सर्व रजिस्टरची तपासणी केली असता, गेले २० ते २५ दिवस एकाही रजिस्टरमध्ये माहिती भरण्यात आलेली नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता अधिक्षकांनी उद्धट उत्तरे दिली.वसतिगृहाची आम्ही पाहणी केली. तेव्हा गंजलेल्या अवस्थेत कॉट व फाटलेल्या बेडशिट आढळून आल्या. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उशा खराब झालेल्या होत्या. वसतिगृहाच्या वरील मजल्यावरील शौचालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना खालील मजल्यावर जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.

पोषण आहार खोलीतील चणाडाळ, गहू, तांदूळ या आहाराला कीड लागली होती. हजेरीपटावर ३४ मुले असताना केवळ सात ते आठ मुले हजर होती. तर १७ मुले गैरहजर असल्याचे अधिक्षकांनी सांगितले. संगणक कक्ष बंदावस्थेत होता. वाचनालयही बंद होते़.त्यामुळे कणकवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर हे नवे वसतिगृह करण्यामागचे कारण काय? कोणाचीही परवानगी न घेता हे स्थलांतर करण्यात आले. वसतिगृहाचे अधीक्षक त्याठिकाणी न राहता ते कणकवलीत राहत आहेत.

या वसतिगृहाचे भाडे किती देता? असे विचारले असता त्याबाबत माहिती सांगण्यास अधिक्षकांनी टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांचे जेवण स्वयंपाकगृहामध्ये न ठेवता ते हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व बाबींचा विचार करता सर्व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत असून मुलांची हेळसांड करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग