शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:08 IST

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.

ठळक मुद्देशासकीय वसतिगृह भ्रष्टाचाराचे कुरण : दिलीप तळेकर यांचा आरोप प्रत्यक्ष पाहणीत आढळले कीड लागलेले धान्य

कणकवली : कलमठ येथे सुरू असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चुकीच्या पद्धतीने हरकुळ बुद्रुक येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार वसतिगृहाचे अधीक्षक व कर्मचारी करीत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत समोर आली आहे.

प्रतिवर्षी ४० लाख रुपये अनुदान मिळत असलेल्या या वसतिगृहाला अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे, असा आरोप पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केला.हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहाच्या पाहणीनंतर कणकवली पंचायत समितीच्या सभापती दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, शामसुंदर दळवी, पंचायत समिती अधीक्षक अनिल चव्हाण, पालकर व अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.दिलीप तळेकर म्हणाले, कणकवली पंचायत समिती सदस्य गणेश तांबे यांनी या शासकीय वसतिगृहातील समस्येबाबत माहिती मागविली होती. त्याबाबत त्यांना अधीक्षकांनी दिलेली माहिती खरी आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अचानक गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य, अधिकारी यांना घेऊन वसतिगृहाला भेट दिली. या भेटीत वसतिगृह अधीक्षक यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली.या वसतिगृहात सहा कर्मचारी असून त्यापैकी १ कर्मचारी सुट्टीवर होता. तर चार कर्मचारी हजेरीपटावर सही करून गायब होते. फक्त वसतिगृह अधीक्षक एस. पी. जाधव उपस्थित होते. संबंधित वसतिगृहाच्या सर्व रजिस्टरची तपासणी केली असता, गेले २० ते २५ दिवस एकाही रजिस्टरमध्ये माहिती भरण्यात आलेली नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता अधिक्षकांनी उद्धट उत्तरे दिली.वसतिगृहाची आम्ही पाहणी केली. तेव्हा गंजलेल्या अवस्थेत कॉट व फाटलेल्या बेडशिट आढळून आल्या. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उशा खराब झालेल्या होत्या. वसतिगृहाच्या वरील मजल्यावरील शौचालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना खालील मजल्यावर जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.

पोषण आहार खोलीतील चणाडाळ, गहू, तांदूळ या आहाराला कीड लागली होती. हजेरीपटावर ३४ मुले असताना केवळ सात ते आठ मुले हजर होती. तर १७ मुले गैरहजर असल्याचे अधिक्षकांनी सांगितले. संगणक कक्ष बंदावस्थेत होता. वाचनालयही बंद होते़.त्यामुळे कणकवलीपासून सहा किलोमीटर अंतरावर हे नवे वसतिगृह करण्यामागचे कारण काय? कोणाचीही परवानगी न घेता हे स्थलांतर करण्यात आले. वसतिगृहाचे अधीक्षक त्याठिकाणी न राहता ते कणकवलीत राहत आहेत.

या वसतिगृहाचे भाडे किती देता? असे विचारले असता त्याबाबत माहिती सांगण्यास अधिक्षकांनी टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांचे जेवण स्वयंपाकगृहामध्ये न ठेवता ते हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व बाबींचा विचार करता सर्व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत असून मुलांची हेळसांड करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग