शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शासकीय इमारती झाडीत हरवल्या, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 17:43 IST

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे ...

ठळक मुद्देछपरांना गळती, जनतेमधून नाराजीचा सूरसिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तअधिकारी दौरे करण्यात मग्न

ओरोस ,दि. ९ : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आवारातील शासकीय इमारतींवर झाडींचे साम्राज्य पसरले आहे. इमारतींवर कौलारू छप्पर घालण्यात आलेले असून त्याची ठिकठिकाणी मोडतोड झाल्यामुळे छपराला गळती लागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहे बंद असून दरवाजा दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. इमारतीत पाण्याचे पाईप फुटून पाणी वाया जात आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र मुख्यालयातील परिसरात दिसत आहे.

दरम्यान, अनेक शासकीय कामांसाठी जिल्ह्यातील लोक येथे येत असतात. मात्र, या ठिकाणची परिस्थिती पाहून जनतेतूनच नाराजीचे सूर उमटत आहेत. शासकीय यंत्रणेची ही बिकट परिस्थिती असेल तर इतर कार्यालयांची काय अवस्था असणार असे सूर उमटत आहेत.

या सर्व समस्यांचा उल्लेख नियोजन समितीच्या बैठकीत केला जातो. मात्र, या इमारतींना २५ वर्षे पूर्ण होत असून इमारतींची डागडुजी कोण करणार? हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी झाडींचे साम्राज्य पसरले आहे तर इमारतींच्या आत स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहेत.

अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये नळ नाहीत, दरवाजे बंद अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ही शौचालये दोऱ्यांनी बंद करून ठेवलेली पहावयास मिळत आहेत.अधिकारी दौरे करण्यात मग्नयेथील जिल्हा प्रशासकीय अधिकारी व निवासी अधिकारी यांचे लक्ष मात्र आपण काम करीत असलेल्या प्रशासकीय इमारतींकडे नसून बाहेरचा दौरा करण्यात ते मग्न असतात. एखादा अधिकारी इमारतींच्या आवारात महिन्यातून एक दिवस भेट देऊन या सर्व प्रकारांची पहाणी करेल अशी आशा जनता करीत आहे.

जिल्ह्याची राजधानी समस्याग्रस्तप्रशासनाच्या नियोजन समिती सभेत यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीला आवाज उठविण्याचे धाडस होत नाही. सामान्य जनतेला मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर या परिसरातील व मुख्य रस्त्यांवरील पथदीप बंद असतात. रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना अंधारातून घरी जावे लागते.

कोणत्याही सोयी सुविधा नसल्यामुळे फक्त जिल्ह्याची मुख्य राजधानी म्हणून नावारूपाला आलेली सिंधुदुर्गनगरी असे मोठ्या दिमाखात याठिकाणी ही वास्तू उभी आहे. याकडे पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे अशी शासकीय कामानिमित्त येणाऱ्या  जनतेची मागणी आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार