शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

सिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:13 IST

shiv bhojnalaya Sindhudrg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते १३ महिन्यांत १ लाख, ८४ हजार ५६६ गरजूंनी घेतला लाभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.गरीब, गरजू व कष्टकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. २६ जानेवारी २०२० मध्ये एकाच दिवशी राज्यभरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील डीआरडीए येथे केंद्र स्थापन करून शुभारंभ केला. सुरुवातीला थाळीची किंमत १० रुपये होती. दोन चपात्या, भाजी, आमटी व भात असा आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाच्या काळात या थाळीची किंमत कमी करण्यात आली.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या काळात मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेर गावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी थाळीची किंमत कमी करण्यात आली होती.या थाळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या १२ केंद्रे सुरू आहेत. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यात थाळीची प्रतिदिन मर्यादा १०० आहे तर इतर पाच तालुक्यांत हीच मर्यादा ७५ थाळींची आहे. दर पंधरा दिवसांनी शिवभोजन केंद्र चालकांचे बिल अदा केले जाते. या योजनेसाठी पुरेसा निधी सरकारकडून प्राप्त होत आहे.शिवभोजन थाळी योजना यशस्वीशिवभोजन थाळीला गरीब व गरजू नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी सुरू झालेली शिवभोजन थाळी ही योजना आज खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसून येत आहे. गेल्या १३ महिन्यांत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत या थाळीचा १ लाख ८४ हजार ५६६ जणांनी लाभ घेतला आहे.प्रतिष्ठित व्यक्तीही घेतात या योजनेचा लाभया योजनांचा लाभ गरीब व गरजू नागरिकांनी घ्यावा असे सरकारने म्हटले आहे. परंतु बऱ्याच वेळा काही कर्मचारी, धनधांडगे नागरिक या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा खरे लाभार्थी बाजूलाच राहतील व लाभ दुसरेच घेतील असे व्हायला नको.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयsindhudurgसिंधुदुर्ग