शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:13 IST

shiv bhojnalaya Sindhudrg-सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते १३ महिन्यांत १ लाख, ८४ हजार ५६६ गरजूंनी घेतला लाभ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्याबाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या १३ महिन्यांत १ लाख ८४ हजार ५६६ गरजूंनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.गरीब, गरजू व कष्टकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही नावीन्यपूर्ण योजना सुरू केली. २६ जानेवारी २०२० मध्ये एकाच दिवशी राज्यभरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील डीआरडीए येथे केंद्र स्थापन करून शुभारंभ केला. सुरुवातीला थाळीची किंमत १० रुपये होती. दोन चपात्या, भाजी, आमटी व भात असा आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाच्या काळात या थाळीची किंमत कमी करण्यात आली.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. या काळात मजूर, स्थलांतरित, बेघर, बाहेर गावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी थाळीची किंमत कमी करण्यात आली होती.या थाळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या १२ केंद्रे सुरू आहेत. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यात थाळीची प्रतिदिन मर्यादा १०० आहे तर इतर पाच तालुक्यांत हीच मर्यादा ७५ थाळींची आहे. दर पंधरा दिवसांनी शिवभोजन केंद्र चालकांचे बिल अदा केले जाते. या योजनेसाठी पुरेसा निधी सरकारकडून प्राप्त होत आहे.शिवभोजन थाळी योजना यशस्वीशिवभोजन थाळीला गरीब व गरजू नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी रोजी सुरू झालेली शिवभोजन थाळी ही योजना आज खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसून येत आहे. गेल्या १३ महिन्यांत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत या थाळीचा १ लाख ८४ हजार ५६६ जणांनी लाभ घेतला आहे.प्रतिष्ठित व्यक्तीही घेतात या योजनेचा लाभया योजनांचा लाभ गरीब व गरजू नागरिकांनी घ्यावा असे सरकारने म्हटले आहे. परंतु बऱ्याच वेळा काही कर्मचारी, धनधांडगे नागरिक या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा खरे लाभार्थी बाजूलाच राहतील व लाभ दुसरेच घेतील असे व्हायला नको.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयsindhudurgसिंधुदुर्ग