शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

देवगडवासीयांसाठी गुड न्यूज, देवगड आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:20 IST

गेले अनेक दिवस मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. आनंदवाडी येथील बंदर प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर गेली अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे देवगडवासीयांसाठी ही गुड न्यूज असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.

ठळक मुद्देस्थानिकांचा विरोध लक्षात घेत प्रकल्प लोकवस्तीपासून ५०० मीटर पुढे प्रकल्पाची किंमत वाढून ती ८८.४ कोटींपर्यंत प्रमोद जठार यांच्या तपश्चर्येला फळ

देवगड : गेले अनेक दिवस मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. आनंदवाडी येथील बंदर प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर गेली अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे देवगडवासीयांसाठी ही गुड न्यूज असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.

याबाबत माहिती प्रथम येथील स्थानिकांचा विरोध लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून ५०० मीटर पुढे सरकविण्यात आला होता.त्यानंतर अनेक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. मात्र माजी आमदार प्रमोद जठार यांनी हा प्रकल्प होण्यासाठी सतत पाठपुरावा चालू ठेवला. त्यासाठी अनेकवेळा दिल्ली वारी देखील केली. या कालावधीत प्रकल्पाची किंमत वाढून ती ८८.४ कोटींपर्यंत पोहोचली.

सुरुवातीला केंद्र शासनाचा निधी ७५ टक्के आणि राज्याचा निधी २५ टक्के असे ठरले होते.त्यानंतर त्यामध्ये बदल होऊन केंद्र शासनाकडून ५० टक्के व राज्य शासनाकडून ५० टक्के असे ठरले. मात्र, त्यानंतर यामध्ये बदल होउन केंद्र शासन २५ कोटी रुपये आणि प्रकल्पाची उर्वरित रक्कम ६३.४ राज्य शासनाने द्यावेत असे ठरले.

सदर ६३.४ कोटी च्या मंजुरीचे पत्र राज्य शासनाने केंद्राला देणे गरजेचे होते. याबाबत जठार यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ६३.४ कोटी रुपये मंजूर करुन मागील बजेटमध्ये १० कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. मात्र, केंद्राच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत हा प्रकल्प होता.

केंद्राच्या या २५ कोटीपैकी पन्नास टक्के म्हणजे साडेबारा कोटी रुपये अ‍ॅग्रीकल्चर डिपार्टमेंटक डून तर उर्वरित साडेबारा कोटी रुपये सागरमाला मधून मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी अ‍ॅग्रीकल्चरकडून मिळणारे साडेबारा कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले होते. त्यानंतर साडेबारा कोटी रुपये सागरमालामधून मंजूर होण्यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन मंजुरीसाठी प्रयत्न केला होता.

तपश्चर्येला फळ मिळालेगडकरी यांनीही याबाबत लक्ष घालून सागरमालामधून साडेबारा कोटी निधीला मंजुरी दिली आहे. त्याबाबतच्या मंजुरीचे पत्र घेण्यासाठी प्रमोद जठार यांना दिल्ली येथे बोलावून मंजुरीचे पत्र त्यांचेकडे सूपूर्द केले आहे. त्यामुळे आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला असून येथील स्थानिक ग्रामस्थ आणि प्रमोद जठार यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येला फळ मिळाले आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीsindhudurgसिंधुदुर्ग