शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याप्रमाणेच शिथिलता द्या : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष- प्रमोद जठार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:12 IST

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत.

ठळक मुद्देअशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

कणकवली : गोवा सरकारप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा राज्याने ज्याप्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली, त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्गात शेतकरी, मजूर यांना आता अवघा महिना बेगमीच्या कामांसाठी शिल्लक राहिला असून या महिन्याभरात पावसाळ्याची पूर्वतयारी व बेगमीचा बाजार करण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांचे आपण लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्गबाहेर असलेल्या जिल्हावासीयांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा.

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. शेतक-यांना पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्यांची दुकाने सुरू न ठेवल्यास शेतकºयांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.

अनेकांची घरे अर्थवट स्थितीत आहेत. पावसाळ्यातील लाकडे साठा करून ठेवण्यासाठी गावात मजूर उपलब्ध होत नाहीत. संचारबंदी असल्याने मजूर कामाला जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गातील दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरीलजीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह घराचे बांधकाम, छपराचे काम, पत्रे, प्लास्टिक, ताडपत्री अशा अनेक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. बेगमीच्या बाजारासाठी किराणा व त्या अनुषंगाने दुकाने दिवसभर सुरु ठेवून जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गात सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले होते. त्याचा फटका लॉकडाऊन काटेकोर पाळणा-या सिंधुदुर्गवासीयांना बसता नये. या दृष्टीने काळजी घेण्याची मागणीही प्रमोद जठार यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या