शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

गोव्याप्रमाणेच शिथिलता द्या : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष- प्रमोद जठार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:12 IST

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत.

ठळक मुद्देअशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

कणकवली : गोवा सरकारप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा राज्याने ज्याप्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली, त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्गात शेतकरी, मजूर यांना आता अवघा महिना बेगमीच्या कामांसाठी शिल्लक राहिला असून या महिन्याभरात पावसाळ्याची पूर्वतयारी व बेगमीचा बाजार करण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांचे आपण लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्गबाहेर असलेल्या जिल्हावासीयांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा.

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. शेतक-यांना पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्यांची दुकाने सुरू न ठेवल्यास शेतकºयांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.

अनेकांची घरे अर्थवट स्थितीत आहेत. पावसाळ्यातील लाकडे साठा करून ठेवण्यासाठी गावात मजूर उपलब्ध होत नाहीत. संचारबंदी असल्याने मजूर कामाला जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गातील दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरीलजीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह घराचे बांधकाम, छपराचे काम, पत्रे, प्लास्टिक, ताडपत्री अशा अनेक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. बेगमीच्या बाजारासाठी किराणा व त्या अनुषंगाने दुकाने दिवसभर सुरु ठेवून जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गात सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले होते. त्याचा फटका लॉकडाऊन काटेकोर पाळणा-या सिंधुदुर्गवासीयांना बसता नये. या दृष्टीने काळजी घेण्याची मागणीही प्रमोद जठार यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या