शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

गोव्याप्रमाणेच शिथिलता द्या : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष- प्रमोद जठार यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:12 IST

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत.

ठळक मुद्देअशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

कणकवली : गोवा सरकारप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा राज्याने ज्याप्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली, त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्गात शेतकरी, मजूर यांना आता अवघा महिना बेगमीच्या कामांसाठी शिल्लक राहिला असून या महिन्याभरात पावसाळ्याची पूर्वतयारी व बेगमीचा बाजार करण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांचे आपण लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्गबाहेर असलेल्या जिल्हावासीयांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा.

या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. शेतक-यांना पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्यांची दुकाने सुरू न ठेवल्यास शेतकºयांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.

अनेकांची घरे अर्थवट स्थितीत आहेत. पावसाळ्यातील लाकडे साठा करून ठेवण्यासाठी गावात मजूर उपलब्ध होत नाहीत. संचारबंदी असल्याने मजूर कामाला जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गातील दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरीलजीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह घराचे बांधकाम, छपराचे काम, पत्रे, प्लास्टिक, ताडपत्री अशा अनेक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. बेगमीच्या बाजारासाठी किराणा व त्या अनुषंगाने दुकाने दिवसभर सुरु ठेवून जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सिंधुदुर्गात सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले होते. त्याचा फटका लॉकडाऊन काटेकोर पाळणा-या सिंधुदुर्गवासीयांना बसता नये. या दृष्टीने काळजी घेण्याची मागणीही प्रमोद जठार यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या