शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामात जिल्ह्याला न्याय देणार

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

रवींद्र वायकर : शिवसेनेतर्फे नूतन पालकमंत्र्यांचा रत्नागिरीत सत्कार

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर सोपवली आहे. जिल्ह्यात विकास करायला भरपूर वाव आहे. त्यासाठी मुंबईत ज्या व्हिजनने आपण काम केले, त्याच व्हिजनने जिल्ह्यातही विकासाची कामे केली जातील. कोणती कामे करायला हवीत, हे लोकांनी सांगण्यापेक्षा लोकांना कोणती कामे हवी आहेत, हे मला समजले पाहिजे तरच मी या जिल्ह्याला न्याय देऊ शकेन, असे उद्गार रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना काढले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पालकमंत्री वायकर यांचा सत्कार समारंभ व शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर वायकर हे प्रथमच रत्नागिरीत आले आहेत. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रमोद शेरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री वायकर यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.वायकर म्हणाले की, खेडमध्ये आपले घर असून, गेली ३० वर्षे मुंबईत राहूनही मी सातत्याने गावात येत होतो. मुंबईपेक्षा गावावर माझे प्रेम आहे. त्याहीपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाने मला खूप काही दिलंय. मुंबई- जोगेश्वरीतून राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर महत्त्वाच्या अनेक पदांवर काम केले. मुुंबई महापालिकेत स्थायी समिती सभापती असताना मुंबईच्या पाण्याच्या समस्येची उकल केली. रत्नागिरी जिल्ह्यातही कोयनेचे अवजल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीत मिळाल्यानंतर समुद्रात जाते. या पाण्याचा चिपळूण परिसरासाठी उपयोग व्हावा, असे आपले प्रयत्न राहणार आहेत.पालकमंत्री म्हणून माझ्याकडून जिल्हावासीयांच्या खूप अपेक्षा असणार हे साहजिक आहे. त्यामुळेच यापुढे जिल्ह्यात आल्यावर नाले, रस्ते, गटारे हे सिमेंट काँक्रिटचे झालेले दिसले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शहरांचा विकास महत्त्वाचा आहेच, गावांचाही विकास तितक्याच जोरकसपणे करणे आवश्यक आहे. शहर आणि गावांमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण व्हायला हवी, त्यावर आपला भर राहील. तसेच दूषित पाणी समुद्राला जाऊन मिळणे योग्य नाही, अशा पाण्यावर प्रक्रिया आवश्यक आहे.शास्त्रज्ञांच्या एका कार्यक्रमात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली. अनेक शास्त्रज्ञ पीएचडी घेतलेले लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. केवळ शास्त्रज्ञ झाल्याने काम संपत नाही, तर शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. दापोली कृषी विद्यापीठ जिल्ह्यात आहे. येथे अनेक वैज्ञानिक आहेत, कृषितज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केलं की, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात भर पडली. येथे भाताचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं? हापूसमधील साका या समस्येबाबत संशोधन करुन समस्या सोडविली का? शास्त्रज्ञ हा केवळ विद्यापीठ व संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहे म्हणून सांगण्यापुरता असता कामा नये, तर तो शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचला पाहिजे. (प्रतिनिधी)सर्व पक्षांतील राजकीय लोकांनी कोकणच्या विकासासाठी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. राजकारणासाठी फक्त निवडणुकीचा एक दिवस राखून ठेवावा. अन्यवेळी केवळ जिल्ह्याच्या विकासाचाच विचार प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही करायला हवा. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असे वायकर म्हणाले. यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि सचिन कदम यांनी आपले विचार मांडले.उपयोग हवा...जिल्ह्यात पायाभूत सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण पालकमंत्री म्हणून प्रयत्नशील राहणार आहोत. महामार्गावर ट्रामा केअर सेंटर्स सुरु झाली. पण, त्याचे काम खरोखरच योग्य पद्धतीने चालते का? तेथे रुग्णवाहिका किती आहेत. डॉक्टर्स उपलब्ध असतात की नाही, याकडे यापुढे सर्वांनीच काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. या यंत्रणा शोभेच्या नाहीत तर त्याचा जनतेला उपयोग व्हायला हवा, असे वायकर म्हणाले.