शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:04 IST

Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.

ठळक मुद्देघुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप राजीव कुबल, मंगेश सामंत यांचा पुढाकार : सतीश लळित यांनी दिली माहिती

ओरोस : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.यासंदर्भात माहिती देताना लळित म्हणाले की, तौक्ते वादळाचा फटका बसून वडाचा पाट धरण परिसरात गेल्या ४० वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजबांधवांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. काल या वस्तीला भेट दिल्यावर झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आले. या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर व प्रसाद जळवी उपस्थित होते.वादळाला आठ दिवस उलटून गेल्यावरही या वस्तीवरील रहिवाशांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असे लक्षात आल्यावर मुंबईतील ह्यऊर्जा मुव्हमेंटह्णचे निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश सामंत यांना त्याची कल्पना दिली.

मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलले कुबल व सामंत यांनी या कुटुंबांना मदत करण्याबाबत अनुकूलता दाखवली. त्यानुसार घुंगुरकाठीच्या माध्यमातून आज वडाचा पाट धरण परिसरात राहणाऱ्या १४ कातकरी कुटुंबांना प्रत्येकी रु. २५०० किमतीच्या एकूण ३५ हजार रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रत्येक किटमध्ये २५ किलो तांदूळ, कडधान्ये, मसाले, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, कांदे, बटाटे, साबण अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. वस्तीवर झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले.मदत पोहोचवता आली याचे समाधान : लळितसमाजातील ह्यनाही रेह्ण वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व ज्यांच्या अस्तित्वाची दखलही नाही, अशा आदिवासी कातकरी कुटुंबांना अल्पशी का होईना, मदत पोहोचवता आली याचे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया सतीश लळित यांनी व्यक्त केली. आधुनिक जगात वावरणाऱ्या आणि विकासाची फळे चाखणाऱ्यांना या कातकरी बांधवांच्या दैन्याची कल्पनाही करता येणार नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जवळ आला तरी विषमतेची दरी आपण सांधू शकलो नाही, याचा खेद आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत पोचू शकलो, यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा