शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

उत्तम घडण होण्यासाठी सर्वसामान्य जागरुकता महत्वाची : सुषमा तायशेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 10:37 IST

तळेरे : काहीतरी करायची जिद्द असेल तर पुढील रस्ता आपोआपच मिळत जातो. त्यासाठी आजूबाजूला काय घडते याची उत्सुकता असली ...

ठळक मुद्देउत्तम घडण होण्यासाठी सर्वसामान्य जागरुकता महत्वाची  : सुषमा तायशेटे तळेरे येथे स्वयंसिध्दा पुरस्कारांचे वितरण

तळेरे : काहीतरी करायची जिद्द असेल तर पुढील रस्ता आपोआपच मिळत जातो. त्यासाठी आजूबाजूला काय घडते याची उत्सुकता असली पाहिजे. सर्वसामान्य जागरूकताही त्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळेच तुमची घडण होत असते. समान विचारांचे मित्रपरिवार असतील तर कुटुंबापेक्षाही त्यांचे जास्त सहकार्य मिळते, त्यामुळेच तुम्ही अधिकाधिक पुढे जाऊ शकता, असे प्रतिपादन कायदा मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांनी तळेरे येथे केले. समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग आणि तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वयंसिध्दा महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सुषमा तायशेटे व डॉ. उज्वला सराफ यांच्या हस्ते स्व. सुनील तळेकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत वरुणकर, कायदा मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे, डॉ. उज्वला सराफ, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोक मुद्राळे, विनय पावसकर, बापू महाडिक, दिलीप पाटील, नितीन तळेकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना सुषमा तायशेटे म्हणाल्या कि, आपल्याकडे प्रचंड हुशारी आहे, मात्र ती शालेय अभ्यासक्रमातच दिसून येते. मग पुढे का जात नाही? खूपच कमी मुल शासकीय सेवेत येतात. यासाठी समान विचारांचे मित्रपरिवार ठेवले पाहिजेत. कुटुंबापेक्षा त्यांचे सहकार्य लाखमोलाचे असते. आपल्याकडची मुले शासकीय सेवेत आली आणि भविष्यात त्यांना जिल्ह्यात सेवा करायची संधी मिळाली तर त्यामुळे आपल्या परीसराचाच विकास होऊ शकेल.

या सर्व गोष्टींसाठी सामान्य जागरुकता असली पाहिजे. त्यासाठी दैनंदिन पेपर वाचले पाहिजेत, अनेक वाहिन्यांवरील संवाद आणि चर्चासत्रे एकली पाहिजेत. असे सांगत या महिलांचा सत्कार आणि सन्मान न करता यासारख्या महिलांना आयुष्यात समर्थपणे उभे राहण्यासाठी समानवता प्रयत्न करणार आहे.आपआपल्या व्यवसायात स्वत:ची वेगळी वाट निवडून त्यात येणा?्या असंख्य अडचणींवर मात करत स्वत:ला सिद्ध करणा?्या ह्यस्वयंसिध्दह्ण महिलांना स्वयंसिध्दा हा पुरस्कार सुषमा तायशेटे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.स्वयंसिध्द महिलांना स्वयंसिध्दा पुरस्काराने गौरवयावेळी शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून दहा महिलांना स्वयंसिध्दा महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रेश्मा डामरी-दाभोळकर (कणकवली), सौ. चैताली काणेकर (वागदे), डॉ. रुपाली वळंजू (कणकवली), रश्मी उपरकर (कणकवली), सायली राणे (तळेरे), श्रीमती संजोग नांदलसकर (तळेरे), राधिका खटावकर (तळेरे), रेश्मा तळेकर (तळेरे), अनुजा लवेकर (कासार्डे), श्रावणी मदभावे (नाधवडे) यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार विजेत्यान्मधून रेश्मा डामरी-दाभोळकर, राधिका खटावकर, श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश गोसावी तर आभार विनय पावसकर यांनी केले. या कार्यक्रमाला श्रावणी आणि मेधांश कम्प्युटरचे प्रशिक्षणार्थी आणि तळेरे परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Womenमहिलाsindhudurgसिंधुदुर्ग