शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

शाही गणेशोत्सवाची सांगता-आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थानचा ४२ दिवसांचा गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 10:09 PM

आचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये,

लोकमत न्यूज नेटवर्कआचरा : आचरा समुद्रकिनाºयावर काहीसे भावूक झालेले वातावरण..... पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू..... आणि बाप्पा जाऊ नये, अशी काहीशी मनामध्ये घर करून राहिलेली भावना गुरुवारी सायंकाळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवसांच्या गणेशमूर्तीला निरोप देताना आचरावासीयांनी अनुभवली. यावेळी असंख्य भाविकांची भावूक स्थिती झाली होती.हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी श्री देव रामेश्वर मंदिर ते आचरा-पिरावाडी समुद्रकिनारा अशी भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.जिल्ह्यात सर्वाधिक दिवस चालणारा गणेशोत्सव म्हणून आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक समुद्रकिनारी सरकू लागली.@विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.मिरवणुकीत हिंदू बांधवांबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद म्हणून मोदक वाटप केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीनेश्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर ‘जनसागरही’ उसळल्याचे चित्र होते.सहा तास मिरवणूकगणेश मिरवणूक रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे पिरावाडी येथील श्री देव चव्हाट्यावर आली. यावेळी गणेशमूर्र्ती काही वेळ ठेवण्यात आली होती. येथे मच्छिमार बांधवांनी गणरायाचे दर्शन घेतले. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. ‘मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी आचरा गाव दुमदुमून गेला होता.