शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Updated: November 15, 2022 19:35 IST

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला असे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे. 

सावंतवाडी : भारत जोडो यात्रेमुळे कॉंग्रेसला जरूर उभारी मिळेल पण थोडा उशीर झाला आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले. नेतृत्वाने सुरूवातीपासूनच याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यामुळे पक्षातील अस्थिरतेचे वातावरण थांबले असते अशी खंत गोवा कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. प्रादेशिक पक्ष संपवणे शक्य नाही. याला भारतातील जनताच मतपेटीतून उत्तर देईल असा टोला ही त्यांनी भाजपाला लगावला. माजी मंत्री खलप मंगळवारी सावंतवाडीत एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी वसंत केसरकर उपस्थित होते.

गोवा सरकारकडून तेथील गाड्या सिंधुदुर्ग व कारवार येथे बाहेर नेल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खलप यांना विचारले असता ते म्हणाले, सद्यस्थितीत गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना ते असह्य होत आहे. अनेकांनी विदेशात जाणे पसंत केले आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या आता अन्य ठिकाणी वळविणे गरजेचे आहे. त्यासाठी कोकणकडे ही पर्यटकांची संख्या वळविल्यास गोव्यावरचा ताण कमी होईल आणि अन्य भागाचा विकास होण्यास मदत होईल असे खलप म्हणाले. 

राजकारणात सद्यस्थितीत फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता हा प्रकार काय नवीन नाही, पण दोन तृतीयांश सदस्य गेल्यांनतर पक्षच दुसर्‍या पक्षात विलीन होतो, असा काही जो नवा पायंडा पडत आहे तो योग्य नाही. आणि हे असेच सुरू राहिल्यास लोकशाहीला घातक ठरू शकते.

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. येणार्‍या निवडणूकीत फायदा होणार की नाही, हे मी सांगू शकत नाही.पण कॉंग्रेसला चांगली उभारी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला भारतातील जनते कडून योग्य उत्तर मिळेल असे सांगत फोडाफोडीचे राजकारण संपले पाहिजे अन्यथा प्रत्येक राजकीय पक्षांचे नुकसान होईल असेही खलप म्हणाले. 

  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस