शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने केला तीन कोटींचा भ्रष्टाचार, वैभव नाईक यांची वनमंत्र्यांसह वनसचिवांकडे तक्रार

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 16:57 IST

तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये

कणकवली: कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तर १ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची विकासकामे मंजूर करून ती आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच वाटप केली असून प्रत्यक्षात कामे न करताच केवळ कागद रंगवून कामांची देयके काढली आहेत. शासकीय निधीत भ्रष्टाचार करून आता स्वतःची बदली परजिल्ह्यात करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कोणाचा पाठिंबा आहे, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.   याबाबत त्यांनी वनमंत्री, वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती, गवारेडे असे वन्यप्राणी शेती फळबागायतींचे नुकसान करीत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र, कायदे धाब्यावर बसवून शासकीय निधीत अपहार करण्यात व्यस्त आहेत.अपहार लोकांना समजण्याअगोदर अधिकारी स्वतःची बदली परजिल्ह्यात करून घेण्याची नवीन पद्धत जिल्ह्यात रुजविली जात आहेत. अनेक शासकीय विभागात असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर सर्व कामांची सखोल चौकशी करावी. तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी तक्रार वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नयेकणकवली वनपरिक्षेत्रासाठी जिल्हानियोजन मधून १ कोटी ३६ लाख ८४ हजार ३२ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्या निधीमधून कणकवली वनपरिक्षेत्राच्या विकासाची कामे मंजूर करणे आवश्यक असताना कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी अनावश्यक स्वरुपाची २१ कामे मंजूर केली आहेत. यापैकी एकाच मजूर संस्थेला एकूण १२ कामे देण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या काम वाटप नियमाचे (मजूर संस्था ३३ टक्के, सुशिक्षितबेरोजगार अभियंता ३३ टक्के, खुला प्रवर्ग ३३ टक्के) उल्लंघन करून उर्वरित ९ कामे देखील आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांची तसेच कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत त्यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.