शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने केला तीन कोटींचा भ्रष्टाचार, वैभव नाईक यांची वनमंत्र्यांसह वनसचिवांकडे तक्रार

By सुधीर राणे | Updated: June 11, 2025 16:57 IST

तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये

कणकवली: कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तर १ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची विकासकामे मंजूर करून ती आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच वाटप केली असून प्रत्यक्षात कामे न करताच केवळ कागद रंगवून कामांची देयके काढली आहेत. शासकीय निधीत भ्रष्टाचार करून आता स्वतःची बदली परजिल्ह्यात करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कोणाचा पाठिंबा आहे, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.   याबाबत त्यांनी वनमंत्री, वनविभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती, गवारेडे असे वन्यप्राणी शेती फळबागायतींचे नुकसान करीत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र, कायदे धाब्यावर बसवून शासकीय निधीत अपहार करण्यात व्यस्त आहेत.अपहार लोकांना समजण्याअगोदर अधिकारी स्वतःची बदली परजिल्ह्यात करून घेण्याची नवीन पद्धत जिल्ह्यात रुजविली जात आहेत. अनेक शासकीय विभागात असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर सर्व कामांची सखोल चौकशी करावी. तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी तक्रार वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.तोपर्यंत अन्यत्र कुठेही बदली करू नयेकणकवली वनपरिक्षेत्रासाठी जिल्हानियोजन मधून १ कोटी ३६ लाख ८४ हजार ३२ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्या निधीमधून कणकवली वनपरिक्षेत्राच्या विकासाची कामे मंजूर करणे आवश्यक असताना कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी अनावश्यक स्वरुपाची २१ कामे मंजूर केली आहेत. यापैकी एकाच मजूर संस्थेला एकूण १२ कामे देण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या काम वाटप नियमाचे (मजूर संस्था ३३ टक्के, सुशिक्षितबेरोजगार अभियंता ३३ टक्के, खुला प्रवर्ग ३३ टक्के) उल्लंघन करून उर्वरित ९ कामे देखील आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांची तसेच कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत त्यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.