शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

पूरपरिस्थितीचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: January 4, 2017 21:48 IST

अरूण नातूंची माहिती : बाधित क्षेत्राचा अहवाल राज्य शासनास सादर

सिंधुदुर्गनगरी : जुलै ते आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० गावांतील १९८९ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली. जुलै ते आॅक्टोबरदरम्यान सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. याचा फटका भातशेतीबरोबरच फळपीक व जमिनीलाही बसला होता. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासन निर्देशाच्या अधीन राहून अहवाल दिल्याची सूचना केली होती. त्यानुसारच अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून१९८९शेतकरीबाधित झाले आहेत. त्यांचे एकूण २६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे. शेतीपिकाच्या नुकसानीचा जास्तीचा समावेश असून या पिकाचे२६१.१ हेक्टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे.फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर २ गावांतील ४ शेतकऱ्यांमध्ये ५० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे. मार्चपर्यंत मदतीची शक्यताचार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या क्षेत्राचा अहवाल संयुक्त स्वाक्षरीने राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मंजूर होऊन साधारणत: मार्च महिन्यापर्यंत नुकसान भरपाईपोटी निधी मिळण्याची शक्यता आहे.देवगड, मालवण, कुडाळ नुकसानी नाहीराज्य शासनाच्या कृषी विभागमार्फत करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व कुडाळ या तीन तालुक्यांमध्ये जुलै ते आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.तालुकाबाधित शेतपिकेफळपिकेजमिनीचे नुकसानकणकवली२२.६ हेक्टर९५ गुंठे-वैभववाडी१३.२८ हेक्टर१ गुंठा५७ गुंठेसावंतवाडी४.७३ हेक्टर२३ गुंठे-दोडामार्ग३५.६ हेक्टर--वेंगुर्ला१८५ हेक्टर--एकूण२६१.२१ हेक्टर११९ गुंठे५७ गुंठे