शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

पूरपरिस्थितीचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: January 4, 2017 21:48 IST

अरूण नातूंची माहिती : बाधित क्षेत्राचा अहवाल राज्य शासनास सादर

सिंधुदुर्गनगरी : जुलै ते आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० गावांतील १९८९ शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली. जुलै ते आॅक्टोबरदरम्यान सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. याचा फटका भातशेतीबरोबरच फळपीक व जमिनीलाही बसला होता. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासन निर्देशाच्या अधीन राहून अहवाल दिल्याची सूचना केली होती. त्यानुसारच अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून१९८९शेतकरीबाधित झाले आहेत. त्यांचे एकूण २६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे. शेतीपिकाच्या नुकसानीचा जास्तीचा समावेश असून या पिकाचे२६१.१ हेक्टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे.फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर २ गावांतील ४ शेतकऱ्यांमध्ये ५० गुंठे क्षेत्र वाहून गेले आहे. मार्चपर्यंत मदतीची शक्यताचार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या क्षेत्राचा अहवाल संयुक्त स्वाक्षरीने राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मंजूर होऊन साधारणत: मार्च महिन्यापर्यंत नुकसान भरपाईपोटी निधी मिळण्याची शक्यता आहे.देवगड, मालवण, कुडाळ नुकसानी नाहीराज्य शासनाच्या कृषी विभागमार्फत करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व कुडाळ या तीन तालुक्यांमध्ये जुलै ते आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.तालुकाबाधित शेतपिकेफळपिकेजमिनीचे नुकसानकणकवली२२.६ हेक्टर९५ गुंठे-वैभववाडी१३.२८ हेक्टर१ गुंठा५७ गुंठेसावंतवाडी४.७३ हेक्टर२३ गुंठे-दोडामार्ग३५.६ हेक्टर--वेंगुर्ला१८५ हेक्टर--एकूण२६१.२१ हेक्टर११९ गुंठे५७ गुंठे