शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 15:44 IST

नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

ठळक मुद्देनरडवे धरणग्रस्तांच्या समस्या प्रथम मार्गी लावा: संदेश पारकर यांची मागणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची घेतली प्रकल्पग्रस्तांसह भेट

कणकवली : नरडवे धरण प्रकल्पाचे काम सुरू होऊन २० वर्षे झाली . मात्र ,अजूनही अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनापासून ते घराच्या मुल्यांकणापर्यंतचे प्रश्न प्रथम सुटणे आवश्यक आहेत. आधी या समस्या मार्गी लावा, नंतरच धरणाचे काम सुरू करा. अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नरडवे प्रकल्पग्रस्तांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची ओरोस येथे भेट घेऊन समस्यांबाबत बुधवारी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाकर ढवळ, सुरेश ढवळ, जयराम ढवळ, मारूती ढवळ, मधुकर पालव, प्रकाश सावंत, गणेश ढवळ, वैभव नार्वेकर आदी उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांचे अनेक मुद्दे आहेत. त्याची सोडवणूक होणे आवश्यक आहे. २० वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ३२ कोटिंचा हा प्रकल्प काहि हजार कोटिंवर जाऊन पोहोचला आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त आजहि वाऱ्यावर आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी भूखंड देण्यात आलेले नाहित. पुनर्वसन गावठाणे तयार करण्यात आलेली आहेत, तेथे सुविधाही नाहित. प्रकल्पग्रस्ताना पर्यायी जमिनीचे वाटप झालेले नाही . ९६४ घरांचे मुल्यांकन करण्याची कार्यवाहि झालेली नाही.ज्यांना उत्पनाचे कोणतेही साधन नाही. अशा प्रकल्पग्रस्तानी करायचे काय? त्यामुळे या समस्या सर्व प्रथम मार्गी लावा व नंतरच काम सुरू करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तानी काम बंद पाडले. मात्र, तरीहि कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी काम सुरू करण्यात आले आहे. हे योग्य नव्हे.वास्तविक अगोदर ठरल्यानुसार प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबतची कार्यवाहि होणे आवश्यक होते. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. दरम्यान , प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. असेही संदेश पारकर यांनी या म्हटले आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग