शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ST Strike : कणकवली-सावंतवाडी मार्गावर २८ दिवसानंतर धावली पहिली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 16:39 IST

उद्या, मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्‍या सुरू होतील असा विश्‍वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.

कणकवली : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ करुन यावर तोडगा देखील काढला. तरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारने अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फेची कारवाई केली आहे. तर काही कर्मचारी कारवाईच्या भितीपोटी कामावर हजर झाले आहेत. परिणामी एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे.सिंधुदुर्गातील एस.टी. कर्मचारी ही गेल्या २८ दिवसांपासून संपावर आहेत. यात सर्व चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी सहभागी झाल्याने एकही एस.टी.फेरी सुटली नव्हती. मात्र, सोमवारी कणकवली-सावंतवाडी मार्गावर पहिली एस.टी. बस फेरी रवाना झाली.यावेळी वाहकाची जबाबदारी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकावर देण्यात आली होती. मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्‍या सुरू होतील असा विश्‍वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.कणकवली बसस्थानकात दुपारी दोन वाजता सुटलेल्या कणकवली-सावंतवाडी एस.टी. बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केला. यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच इतर एस.टी. अधिकारी उपस्थित होते. कणकवली स्थानकातून चार प्रवासी सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप