शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

फटाके वाजवणे,नरकासुर प्रतिमा दहन यावर नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:52 IST

coronavirus, diwali, crackersban, sindhudurg सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.

ठळक मुद्दे कोरोनाच्या काळात वायूप्रदूषण टाळणे आवश्यक ! नागरिकांनी करावे स्वयंशिस्तीचे पालन

सुधीर राणेकणकवली : सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये कोविड -१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्ण वायूप्रदूषणाच्या संसर्गामुळे मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाचा परिणाम लक्षात घेऊन सणांच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शासनाकडून काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत . त्याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर नरकासुर प्रतिमांच्या दहनामुळेही वायुप्रदूषण होते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा कोरडा गवताचा पेंडा , कागद , पुठ्ठा ,लाकूड , प्लास्टिक आदी वस्तूंपासून बनवलेल्या असतात . त्या जाळल्याने कार्बन मोनोक्साईड , हायड्रोकार्बन यांची निर्मिती होते.त्यामुळे वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते . याचा मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो . कोरोना महामारी पसरलेली असतांनाही नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या जाळणे व फटाके फोडणे याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांच्यावेळी उत्साहाच्याभरात होणारी गर्दीही धोकादायक ठरू शकते.सध्या थँडीचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी धुके पडते आणि तापमान अल्प होते . त्यामुळे हवेतील प्रदूषित घटक भूमीजवळ खेचले जातात . हे विषारी घटक आपल्या श्वासोच्छ्वासाच्या संपर्कात येतात . हे प्रदूषित घटक श्वसनक्रियेच्या माध्यमातून आपल्या शरिरात जातात आणि आपल्याला अपायकारक ठरतात . कोरोना महामारीपासून रक्षण करण्यासाठी सध्या आपल्याला शुद्ध हवेची नितांत आवश्यकता आहे . अशा धोकादायक परिस्थितीत नरकासुर प्रतिमादहनासारखे कार्यक्रम करणे घातक ठरू शकते. असे वैद्यकीय तज्ञाचे म्हणणे आहे. त्याचा सजग नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी !कोरोनाच्या कालावधीत वायूप्रदूषण वाढू नये यासाठी स्वयंशिस्तीचे पालन आवश्यक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. कोरोनाच्या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच इतरांच्याही आरोग्याची काळजीही प्रत्येकाने घ्यावी. दमा तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना वायूप्रदूषणामुळे आणखीनच त्रासहोऊ शकतो.- डॉ.कुबेर मिठारी .तालुका आरोग्य अधिकारी, मालवण.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीsindhudurgसिंधुदुर्गDiwaliदिवाळी