शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

फटाके वाजवणे,नरकासुर प्रतिमा दहन यावर नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:52 IST

coronavirus, diwali, crackersban, sindhudurg सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.

ठळक मुद्दे कोरोनाच्या काळात वायूप्रदूषण टाळणे आवश्यक ! नागरिकांनी करावे स्वयंशिस्तीचे पालन

सुधीर राणेकणकवली : सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये कोविड -१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्ण वायूप्रदूषणाच्या संसर्गामुळे मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाचा परिणाम लक्षात घेऊन सणांच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शासनाकडून काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत . त्याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर नरकासुर प्रतिमांच्या दहनामुळेही वायुप्रदूषण होते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा कोरडा गवताचा पेंडा , कागद , पुठ्ठा ,लाकूड , प्लास्टिक आदी वस्तूंपासून बनवलेल्या असतात . त्या जाळल्याने कार्बन मोनोक्साईड , हायड्रोकार्बन यांची निर्मिती होते.त्यामुळे वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते . याचा मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो . कोरोना महामारी पसरलेली असतांनाही नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या जाळणे व फटाके फोडणे याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांच्यावेळी उत्साहाच्याभरात होणारी गर्दीही धोकादायक ठरू शकते.सध्या थँडीचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी धुके पडते आणि तापमान अल्प होते . त्यामुळे हवेतील प्रदूषित घटक भूमीजवळ खेचले जातात . हे विषारी घटक आपल्या श्वासोच्छ्वासाच्या संपर्कात येतात . हे प्रदूषित घटक श्वसनक्रियेच्या माध्यमातून आपल्या शरिरात जातात आणि आपल्याला अपायकारक ठरतात . कोरोना महामारीपासून रक्षण करण्यासाठी सध्या आपल्याला शुद्ध हवेची नितांत आवश्यकता आहे . अशा धोकादायक परिस्थितीत नरकासुर प्रतिमादहनासारखे कार्यक्रम करणे घातक ठरू शकते. असे वैद्यकीय तज्ञाचे म्हणणे आहे. त्याचा सजग नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी !कोरोनाच्या कालावधीत वायूप्रदूषण वाढू नये यासाठी स्वयंशिस्तीचे पालन आवश्यक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. कोरोनाच्या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच इतरांच्याही आरोग्याची काळजीही प्रत्येकाने घ्यावी. दमा तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना वायूप्रदूषणामुळे आणखीनच त्रासहोऊ शकतो.- डॉ.कुबेर मिठारी .तालुका आरोग्य अधिकारी, मालवण.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीsindhudurgसिंधुदुर्गDiwaliदिवाळी