शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:37 AM

वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.

ठळक मुद्दे वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान विद्युत वाहिन्यांच्या घर्षणाने घडला प्रकार

वेंगुर्ला : वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.वडखोल-परबवाडी येथे रविवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन येथील प्रज्ञा परब यांच्या आंबा व काजू बागेला आग लागली. ही आग पुढे पुढे जात तेथील असणाऱ्या गवताच्या गंजीला लागली. या आगीत सुमारे ६ हजारांपेक्षा अधिक गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. तसेच आंबा व काजू कलमे आगीत होरपळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.ही घटना समजताच येथील प्रज्ञा परब, गोपीचंद परब, मुकुंद परब, राजाराम राणे, भास्कर परब, बाबाजी परब, मंगेश परब, नारायण परब, प्रदीप परब, किरण परब, सुशांत राणे, गौरव राणे, काशी परब, गजानन परब, अर्पिता परब, रविना राणे यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.मात्र, ही आग गवताच्या गंजीला लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. दरम्यान, घटनास्थळी वेंगुर्ला नगरपरिषदेचा बंब दाखल झाला. यावेळी बंबावर कार्यरत असलेले सागर चौधरी, लक्ष्मण जाधव, गौरव आरेकर, किरण जाधव, निलेश जाधव, सनातन धमानिया, पंकज पाटणकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.वेंगुर्ला कार्यालयाचे अधिकारी चव्हाण यांना माहिती समजताच त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. तत्काळ येथील वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले. यावेळी प्रज्ञा परब यांनी मेहनत घेऊन काढलेली गवताची गंजी पूर्णत: जळून खाक झाल्याने व ऐन आंबा, काजू हंगामात आंबा व काजू कलमे होरपळून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग