शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नरडवे प्रकल्पग्रस्त पुन्हा उभारणार लढा ! बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:32 IST

शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पग्रस्ताना दिला.

ठळक मुद्देनरडवे प्रकल्पग्रस्त पुन्हा उभारणार लढा, बैठकीत निर्णयराऊत यांच्या पुढाकारातून प्रश्न मार्गी लावणार

कणकवली : नरडवे महमदवाडी धरणाचे काम पूर्ण गतिने सुरू आहे. मात्र, पुनर्वसनाचे काम पूर्णतः ठप्प आहे.गेली १८ वर्ष धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत . केवळ टोलवा-टोलवीचे धोरण स्वीकारले जात असून येथील धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे.परंतु यापुढे अन्याय होवू नये यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून हा प्रश्नमार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी प्रकल्पग्रस्ताना दिला.नरडवे महमदवाडी धरणग्रस्त समन्वय विकास समितीची शनिवारी नरडवे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी संदेश पारकर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.यावेळी शिवसेना विभाग प्रमुख आनंद आचरेकर,मुंबईचे अध्यक्ष सुरेश ढवळ,मारुती ढवळ,नरडवे अध्यक्ष गणेश ढवळ,सचिव प्रभाकर ढवळ,प्रकाश सावंत,मधुकर पालव,लुईस डिसोझा,महेश कदम,सतीश परब,अजय नार्वेकर, सत्यवान कोळगे, रमेश जाधव, अशोक जाधव,मधुकर शिंदे, चंद्रकांत नार्वेकर, दिनेश ढवळ,चंद्रकांत कदम आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.प्रकल्प ग्रस्तांच्या वतीने अध्यक्ष गणेश ढवळ यांनी प्रमुख मुद्दे मांडले . यात वनसंज्ञातील ३४ हेक्टर जमीनी मधील घरे,गोठे,मांगर,फळ झाडे , जमीन व अन्य मालमत्ता संपादित करून भूसंपादन अधिग्रहण कायदा २०१३ च्या बाजारभावाने मोबदला मिळणे, पुनर्वसनासाठी सन १९९९ साली प्रथम कुटुंब संकलन यादि केली त्यावेळी ९६७ कुटूंबाना भूखंड वाटप करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.तथापि प्रकल्प होवून १८ वर्ष झाली आहेत.

स्वतंत्र कुटुंब आणखी वाढली आहेत.तरीही नवीन रजिस्टर तयार होवून त्या नुसार भूखंड वाटप व्हावे. सर्व धरणग्रस्त प्रामुख्याने शेतकरी असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच असल्याने पर्यायी शेतजमीनी शिवाय उदरनिर्वाह अवघड आहे.जमीनीच्या मूल्यांकनासाठी ६५ टक्के रक्कम भरून घ्यावी, जमीनीचा बाजार भावाने मोबदला द्यावा.

धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावामुळे वाढणाऱ्या संभाव्य पाण्यापासून व डोंगर कपारीचा भाग असल्यामुळे वन्यजीवांपासून धोका उपन्न होऊन जीवित हानी होऊ नये म्हणून त्यांचे ही पुनर्वसन व्हावे.बेरोजगारांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे किंवा एक रक्कमी १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा.

प्रकल्पस्थळी जनसुनावणी घेण्यात यावी.मूल्यांकनाबाबत फेर तपासणी करून योग्य मोबदला वाटप करण्यात यावा.नागरिक सुविधा पुरविण्यात येऊन पुनर्वसन करण्यात यावे.प्रचलित बाजार भावाप्रमाणे वाढीव मोबदला द्यावा , सर्वांचे एकत्रित पुनर्वसन करावे.भैरवगाव सानुग्रह प्रस्तावाची पूर्ण माहिती प्रकल्पग्रस्तांना द्यावी अशा ठळक १० मागण्या ग्रामस्थांच्यावतीने यावेळी पारकर यांच्यासमोर मांडण्यात आल्या.यावर पारकर यांनी धरणाचे काम झाले पाहिजे.मात्र पोलीस फौज फाट्याचा वापर करून जर दंडेलशाही होत असेल तर या विरोधात ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना निश्चित पणे उभी राहील. नरडवे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईल.असे ठामपणे सांगितले.तसेच सोमवारी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास ही बाब आणून देवून नरडवे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही दिली.नरडवे महमंदवाडी धरण प्रकल्पाचे काम पोलिस सर्वक्षणात करण्याची गरजच काय? येथील लोक चोर आहेत का?वाहतुकीची सोय नसल्याने कोणी दुचाकीवरून जात असल्यास त्यांना विनाकारण त्रास का दिला जातो?अशा विविध प्रश्नाचा भडिमार ग्रामस्थांनी केला.

नरडवे धरणाला आमचा विरोध नाही.मात्र दमदाटी करून पोलीस बळाचा वापर करत हे काम होत असेल तर अन्याया विरुद्ध लढणे हा आमचा हक्क असून त्यासाठी ही लढाई सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यापुढे पोलीस संरक्षण हटवून ग्रामस्थांना त्रास न होता काम नियमानुसार होण्यासाठी पालकमंत्री व खासदारांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल असे पारकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग