शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

पैसे हडपण्याचा प्रयत्न शेती मित्रांनी उधळला

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू

सावंतवाडी : पाणलोट विभागाच्या ‘आत्मा’ सदस्यांतून ४२ शेतकऱ्यांची २०१३ व २०१४ मध्ये ‘शेती मित्र’ म्हणून निवड करून त्यांना नागरपूर सहलीला नेले होते. मात्र, शेतकऱ्यांना स्वत:चेच पैसे खर्च करण्यास लावून त्यांच्यासाठी शासनाकडून आलेले पैसे परस्पर हडप करण्याचा डाव शेती मित्रांनी उधळून लावला असून, या शेतकऱ्यांना आता प्रत्येकी २ हजार २१६ रुपये वस्तू स्वरुपात मिळणार आहेत.तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना ‘आत्मा’ अंतर्गत कृषी सहलीसाठी नागपूर येथे नेण्यात आले होते. यासाठी शासन निधीतून निम्मा खर्च तसेच नेण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा स्वत:चा निम्मा खर्च, अशी अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सहलीसाठी गेल्यावर स्वत:चे पैसे खर्च केले. मात्र, कृषी विभागाने एक रुपयाही खर्च केला नाही. तसेच नागपूर येथे सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांना शेती अभ्यास दौऱ्यासाठी फिरवण्याऐवजी धर्मस्थळे दाखविण्यात आली. या दरम्यान त्यांना एका धर्मशाळेत ठेवण्यात आले होते.सहल सावंतवाडीत परतल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्चाचा हिशेब मागितला. त्यावेळी कृषी अधिकारी आय. डी . गुरव व इतर अधिकाऱ्यांनी शेती मित्रांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत, सर्व पैसे खर्च झाले, आता पैसे कोठून देऊ, अशी उत्तरे देत अनेक वेळा बैठकीतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे संतप्त शेतीमित्रांनी याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर सर्व शेतकऱ्यांनी आठवडाभरात आमचे पैसे मिळाले नाहीत, तर उपोषण करण्याचा इशारा २८ डिसेंबर २०१४ रोजी दिला होता.कृषी विभागाच्या अधिकारी स्तरावर याबाबत बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी शेतीमित्रांना त्यांच्या वाट्याचे २ हजार २१६ रुपये देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. मात्र, हे पैसे वस्तू खरेदीतून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मळगाव येथील दुकानात इंधन चुली आणण्यात येतील, त्या चुली या शेतीमित्रांनी घ्याव्यात आणि त्यांची बिले कृषी विभागाला द्यावीत, नंतरच हे पैसे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होतील, असा आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शांत आहेत. मात्र, वस्तूएवढ्या किमतीचे पैसे घेतले, तर आम्ही गप्प बसू, अन्यथा आंदोलन छेडू. असा इशारा शेतीमित्रांनी दिला आहे. (प्रतिनिधी)