शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:43 IST

collector Sindhudurg Farmar- खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सर्वच्या सर्व ३५२५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विमा कंपनीचे लक्ष वेधले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत पीक विमा घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५२५ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यासाठी शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख रुपये; तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख रुपये असे एकूण २४ कोटी ५५ लाख रुपये विमा कंपनीकडे भरून ५८९.२५ हेक्टर भातपीक क्षेत्र संरक्षित केले होते.नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तत्काळ विमा कंपनीला सादर करण्याची अट या योजनेत ठेवण्यात आली होती. त्यानुसार नुकसानीची माहिती सादर केलेल्या ४०० शेतकऱ्यांना विमा कंपनीने प्रतिहेक्टरी २३ हजार रुपयांप्रमाणे २३ लाख ६२ हजार रुपये नुकसाभरपाई दिली आहे.सन २०२० च्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडल्याने भातकापणीच्या वेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत होती.या मागणीची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दखल घेत सर्वच शेतकऱ्यांकडे मोबाईल किंवा ऑनलाईन माहिती देण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. इंटरनेट सुविधा गावोगावी नाही. भातशेतीचे नुकसान होत असताना उर्वरित भातशेतीचे नुकसान होऊ नये याकडे लक्ष असल्याने ते नुकसानीची माहिती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना के. मंजुलक्ष्मी यांनी इफ्को टोकियो या विमा कंपनीला केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग