शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:43 IST

collector Sindhudurg Farmar- खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सर्वच्या सर्व ३५२५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विमा कंपनीचे लक्ष वेधले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत पीक विमा घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५२५ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यासाठी शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख रुपये; तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख रुपये असे एकूण २४ कोटी ५५ लाख रुपये विमा कंपनीकडे भरून ५८९.२५ हेक्टर भातपीक क्षेत्र संरक्षित केले होते.नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तत्काळ विमा कंपनीला सादर करण्याची अट या योजनेत ठेवण्यात आली होती. त्यानुसार नुकसानीची माहिती सादर केलेल्या ४०० शेतकऱ्यांना विमा कंपनीने प्रतिहेक्टरी २३ हजार रुपयांप्रमाणे २३ लाख ६२ हजार रुपये नुकसाभरपाई दिली आहे.सन २०२० च्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडल्याने भातकापणीच्या वेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत होती.या मागणीची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दखल घेत सर्वच शेतकऱ्यांकडे मोबाईल किंवा ऑनलाईन माहिती देण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. इंटरनेट सुविधा गावोगावी नाही. भातशेतीचे नुकसान होत असताना उर्वरित भातशेतीचे नुकसान होऊ नये याकडे लक्ष असल्याने ते नुकसानीची माहिती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना के. मंजुलक्ष्मी यांनी इफ्को टोकियो या विमा कंपनीला केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग