शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:27 IST

कोकणातील शेतकरी हा कर्ज कमी घेतो, पण घेतलेले कर्ज वेळेवर फेडतो. शासनाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी हा समारंभ होत आहे. शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण असे उद्गागार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे काढले.

ठळक मुद्दे पात्र शेतकरी लाभांर्थीना केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिपावलीच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गनगरीत समारंभ

सिंधुदुर्गनगरी दि. 18 : कोकणातील शेतकरी हा कर्ज कमी घेतो, पण घेतलेले कर्ज वेळेवर फेडतो. शासनाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी हा समारंभ होत आहे. शेतकरी कर्ज माफी हा ऐतिहासिक क्षण असे उद्गागार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे काढले.जुन्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभांर्थीना पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचे कर्ज मुक्तीबाबत प्रमाणपत्र व साडी-चोळी, पॅन्टपीस-शर्टपीस तसेच श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके, उप विभागीय अधिकारी निता शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक अनिरुद्ध देसाई मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंचविस शेतकरी जोडप्यांचा सन्मान करण्यात आला.जिल्हा बँकेने खावटी कर्ज वितरणात सवलत मिळावी, दसऱ्यानंतर जिल्ह्यात झालेला पाऊस व त्यामुळे भातशेतीचे झालेले नुकसान याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात आधुनिक भात गिरणीची सुरुवात झाली आहे. भाताला हमी भावापेक्षा 10 टक्के जादा दर देऊन या गिरणीमार्फत भात खरेदी केली जाणार आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तथापि शेतकऱ्यांनी भाताचे उत्पादन वाढविण्यावर भर दयायला हवा.

शेतीचे यांत्रिकीकरण होऊन विशेषत: महिला वर्गाचे शेतीतील कष्ट कमी व्हावेत या दृष्टीकोनातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून या योजनेपायी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करुन शेवटी दिपावलीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.जिल्हा बँकेचे अघ्यक्ष सतिश सावंत यावेळी म्हणाले की, जिल्हा बँकेच्या 64 शाखा व विकास संस्थेच्या 226 शाखातील जिल्हा बँकेच्या 21 हजार 172 सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ होत आहे. या बद्धल शासनाचे आभार व अभिनंदन करतो. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं.

जिल्ह्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी लाभांर्थीची संख्या मोठया प्रमाणावर आहे. प्रोत्सहानपर अनुदान हे अत्यंत कमी आहे या अनुदानात वाढ व्हावी, रंगनाथन समितीने जाहिर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.आमदार वैभव नाईक यांनी कर्ज मुक्ती करताना शेतकऱ्यांचा सन्मान केला याबद्धल शासनाचे अभिनंदन करुन ते म्हणाले शेती मालाला हमी भाव मिळण्याची नितांत गरज आहे. यंदा अवेळी झालेल्या पाऊसामुळे ओला दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती पालकमंत्री महोदयांनी शासनाकडे मांडावी.प्रांरभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी प्रास्ताविक केले. शेवटी धुळप यांनी आभार मानले. सुत्रसंचालन शरद सावंत यांनी केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार