शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:06 IST

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषेपरशुराम उपरकर यांची टीका ; अल्टी,पल्टी, कल्टी' कारनामे सुरू

कणकवली : सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कणकवली येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार असे आश्वासन दिले होते. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

त्याचप्रमाणे कुडाळ येथे महिलांसाठी शासकीय रुग्णालय उभारण्याचेही आश्वासनही देण्यात आले होते. तेही पूर्ण करण्यात आलेले नाही. आता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन देऊन भूमिपूजन केले आहे. ते आश्वासनही फसवेच ठरणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था संपूर्ण खिळखिळी झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना गोवा, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. सामान्य जनतेला चांगले उपचार जिल्ह्यात मिळणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीच काही करीत नाहीत.पालकमंत्र्यांकडे जादुई शक्ती आहे का ?सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. इतक्या कमी कालावधीत हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर सांगतात त्याप्रमाणे पालकमंत्र्यांकडे जादुई अथवा कोणती तरी शक्ती आहे का ? हे त्यांनी स्पष्ट करावे.

पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे चिपी विमानतळावर गणेशोत्सवात विमान उतरले नाही. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या तरी नेत्याचे विमान तिथे उतरेलही. पण प्रवासी विमान कधी उतरणार ते पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अजून किमान वर्षभर तरी प्रवासी विमान तिथे उतरणार नाही. कारण अजूनही त्यासाठी लागणाºया बºयाच परवानग्या मिळायच्या अजूनही बाकी आहेत. असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग