शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:06 IST

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषेपरशुराम उपरकर यांची टीका ; अल्टी,पल्टी, कल्टी' कारनामे सुरू

कणकवली : सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कणकवली येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार असे आश्वासन दिले होते. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

त्याचप्रमाणे कुडाळ येथे महिलांसाठी शासकीय रुग्णालय उभारण्याचेही आश्वासनही देण्यात आले होते. तेही पूर्ण करण्यात आलेले नाही. आता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन देऊन भूमिपूजन केले आहे. ते आश्वासनही फसवेच ठरणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था संपूर्ण खिळखिळी झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना गोवा, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. सामान्य जनतेला चांगले उपचार जिल्ह्यात मिळणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीच काही करीत नाहीत.पालकमंत्र्यांकडे जादुई शक्ती आहे का ?सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. इतक्या कमी कालावधीत हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर सांगतात त्याप्रमाणे पालकमंत्र्यांकडे जादुई अथवा कोणती तरी शक्ती आहे का ? हे त्यांनी स्पष्ट करावे.

पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे चिपी विमानतळावर गणेशोत्सवात विमान उतरले नाही. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या तरी नेत्याचे विमान तिथे उतरेलही. पण प्रवासी विमान कधी उतरणार ते पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अजून किमान वर्षभर तरी प्रवासी विमान तिथे उतरणार नाही. कारण अजूनही त्यासाठी लागणाºया बºयाच परवानग्या मिळायच्या अजूनही बाकी आहेत. असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग