शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सिंधुदुर्गनगरी : निरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:32 IST

मच्छिमारांनी गोवा राज्यातील तीन एलईडी पर्ससीन नौका पकडून आणल्या. यात जिल्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून मच्छिमार समाजातील निरपराध मच्छिमारांवर त्या घटनेशी संबंध नसताना गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देनिरपराध मच्छिमारांवर खोटे गुन्हे : कृष्णनाथ तांडेल यांचा आरोपपोलीस अधीक्षकांची हुकूमशाहीमच्छिमारांचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा पडत नाही?

 

मालवण : मच्छिमारांनी गोवा राज्यातील तीन एलईडी पर्ससीन नौका पकडून आणल्या. यात जिल्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून मच्छिमार समाजातील निरपराध मच्छिमारांवर त्या घटनेशी संबंध नसताना गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हुकूमशाही पद्धतीने हेतूपुरस्सर मच्छिमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोन्हा यांना गोवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर ‘थर्ड डिग्री’चाही वापर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी केला.

पोलिसांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असल्यास मच्छिमारांच्या असंतोषाची खदखद शासन दरबारी पोहोचविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही तांडेल यांनी दिला.मालवण येथील हॉटेल सागर किनारा येथे मच्छिमार सोसायट्यांचे प्रतिनिधी व मच्छिमारांनी पत्रकार परिषद आयोजित करून पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या हुकूमशाही पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी  कृष्णनाथ तांडेल, स्वप्नील पराडकर, दीनानाथ धुरी, नितीन आंबेरकर, सुनील खवणेकर, चिन्मय तांडेल, नागेश परब, नरी जामसंडेकर, मनीष खडपकर, नारायण आडकर, शंकर मुंबरकर, सुधीर जोशी, प्रमोद खवणेकर, भिवा आडकर, भगवान मुंबरकर, पुंडलिक परब, विकी चोपडेकर, रुपेश लोणे, नितीन परुळेकर, महादेव आडकर, विक्रम आडकर, बाळा आंबेरकर, स्वप्नील आचरेकर, संदीप कोयंडे, दीपक जामसंडेकर यांच्यासह भद्रकाली, रामेश्वर व सर्जेकोट सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी तांडेल म्हणाले, महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास बंदी असताना  त्यांच्याकडून एलईडी मासेमारीच्या सहाय्याने घुसखोरी करून अव्याहतपणे मासळीची लूट केली जाते. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

शासनाच्या अनास्थेमुळेच मच्छिमारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली जात नाही. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास सरकार मुभा देते. मुळात कमकुवत कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा केल्यास अनियंत्रित मासेमारीला चाप बसू शकतो.पोलिसांचा मनमानी कारभारस्थानिक मच्छिमारांनी तीन नौका पकडल्या. या प्रकरणात काहीही संबंध नसलेल्या सेवाभावी व नि:स्वार्थी गोपीनाथ तांडेल यांच्यावर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गंभीर गुन्हे दाखल केले. तसेच निरपराध मच्छिमारांना या प्रकरणात गोवले जात आहे. पोलीस अधीक्षकांवर अन्यत्र बदलीची गदा येईल, या भीतीने ते ताब्यात घेतलेल्या मच्छिमारांवर ‘थर्ड डिग्री’चा वापर करीत हेतूपुरस्सर गुन्ह्यात अडकवित आहेत.

या प्रकरणात मच्छिमार बांधव भरडले जात असून पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात असंतोषाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा कृष्णनाथ तांडेल यांनी दिला. या मोर्चातून शासनाला जागे करण्यासठी कोळंब, सर्जेकोट, मिर्याबांदा व रेवंडी आदी गावातील मच्छिमार सहभागी होतील, असेही तांडेल यांनी सांगितले. मच्छिमारांचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा पडत नाही?पोलिसांनी मच्छिमारांविरोधात हुकूमशाही सुरू केली आहे. मच्छिमारांवर खोटे गुन्हे दाखल होत असताना त्यांना असहाय्य परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आमदार प्रयत्न करीत नाहीत. प्रशासनाकडून कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने मच्छिमार जीव धोक्यात घालून परराज्यातील नौका पकडून आणत आहेत.मच्छिमारांच्या असंतोषाचा आक्रोश पालकमंत्र्यांच्या कानी कसा काय पडत नाही? असा सवाल करताना तांडेल यांनी पालकमंत्री कमकुवत असून ते पालक नसल्यासारखेच वागतात, अशी टीका केली.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग