शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

फेक न्यूज : सिंधुदुर्ग : तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे तितकेच तोटे : दिलीप पांढरपट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:36 IST

तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही भयावह आहेत. मजकूर पुढे पाठविताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

ठळक मुद्देतंत्रज्ञान वापराचे जितके फायदे तितकेच तोटे : दिलीप पांढरपट्टेसिंधुदुर्गनगरीत फेक न्यूज व समाज माध्यम याविषयी चर्चासत्राचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही भयावह आहेत. मजकूर पुढे पाठविताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पत्रकार कक्षामध्ये फेक न्यूज व समाज माध्यम याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.या चर्चासत्रामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सिंधुदुर्ग पोलीस सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे आदींसह पत्रकार उपस्थित होते.गुन्हेगार हे नवनवीन युक्त्या वापरून गुन्हे करीत असतात असे सांगून डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच त्याचा गैरफायदा घेण्याचे तंत्र गुन्हेगारांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे करत आहेत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेकवेळा खोटी माहिती, अफवा पसरवण्याची प्रकरणे घडत आहेत. एखादी चांगली माहिती पुढे पाठवावी. पण, समाजामध्ये भीती, तेढ निर्माण करणारी माहिती पुढे पाठवू नये. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मेसेजची खातरजमा करून मगच तो पुढे पाठवावा.सध्या लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटरचे व्यसन जडल्याचे दिसते. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यातून तरुण पिढीचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आल्याचेही दिसते. मोबाईलचा अतिरेकी वापर ही सुद्धा मोठी समस्या आहे. आपण सर्वांनी या मोबाईलच्या अतिरेकापासून स्वत:ला वाचवले पाहिजे.

विनाकारण मेसेज पुढे पाठविणे, व्हॉट्सअ‍ॅपवर तासन्तास चॅटिंग करणे खरेच गरजेचे आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोबाईलचा अतिरेक थांबविण्याची सुरुवात आपल्यापासून करुया, असे आवाहनही डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी केले.एखादे ज्ञान किंवा चांगली उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा वापर योग्य असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले की, लोकांमध्ये द्वेष, भीती पसरवणे, त्यांच्या भावना दुखावणे हा सायबर गुन्हा आहे.समाज माध्यमांमधून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असले तर तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेसेज पूर्ण वाचून त्याविषयी खातरजमा करुनच तो पुढे गेला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी सजग असले पाहिजे.बँकेच्या खात्याविषयी कोणी माहिती मागितल्यास ती देऊ नये. आंदोलनासारख्या परिस्थितीमध्ये वातावरण बिघडेल अशा स्वरुपाचे कोणतेही फोटो, मेसेज पुढे पाठवू नयेत. अशाप्रकारचे मेसेज पुढे पाठविल्यास यासंबंधी गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या फेक न्जूज, अफवा, तेढ निर्माण करणरे मेसेज, फेक अकाऊंट या गोष्टींविषयी कायदे आहेत. त्यामुळे या गोष्टी केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहितीही सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी केले. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर बाळ खडपकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.वैयक्तिक माहिती खुली करू नयेअफवांविषयी सजग नागरिक या नात्याने आपण माहितीची खातरजमा करावी. सध्या समाज माध्यमांतून अनेक प्रकारच्या अफवा आणि खोटी माहिती पसरविली जात आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.फेक न्यूज कोणती आणि सत्य माहिती कोणती याची शहानिशा करणे गरजेचे आहे. कोणताही मेसेज पुढे पाठविताना तो वाचून त्याची खातरजमा करावी, माहितीविषयी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तो मेसेज पुढे पाठवू नये.त्याविषयी पोलिसांना माहिती कळवावी.

फेक अकाऊंट व अनोळखी फोन नंबर्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. यामुळे प्रत्येकाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली वैयक्तिक माहिती समाज माध्यमांच्या आधारे खुली करु नये, असे सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी सांगितले.लिंक्स ओपन करू नयेतअनेकवेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात. अशा लिंक्स स्वरुपात असतात. अशा लिंक्स ओपन करून नयेत.  ज्या लिंक्स सुरक्षित नसतात त्यातून तुमच्या संगणकामध्ये व्हायरस येऊ शकतो.

तसेच संगणकामधील माहितीची चोरी होण्याचीही भीती असते. बँकेकडून कोणत्याही प्रकारच्या खात्यासंबंधीची माहिती तसेच ओटीपी विचारले जात नाहीत. त्यामुळे कोणाही ओटीपी सांगू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाsindhudurgसिंधुदुर्ग