शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

अखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरू, मुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:56 IST

अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देअखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरूमुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

वैभववाडी : अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पंचगंगेच्या पुराची पातळी वाढल्याने १ आॅगस्टच्या रात्रीपासून प्रशासनाने बालिंगा (कोल्हापूर) पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली होती. त्याच दरम्यान गगनबावडा ते कोल्हापूर दरम्यान मांडकुली, किरवे, लोंघे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. मात्र, ४ आॅगस्टला दुपारी २-३ तासच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे महापुराने रौद्र रुप धारण केले होते.कोल्हापूरला महापुराचा विळखा पडल्याने काही दिवस सिंधुदुर्गचा कोल्हापूरशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे परिसरात जाणाऱ्या अवजड वाहनांनी तळेरे-कोल्हापूर मार्ग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत वैभववाडीत मुक्काम ठोकला होता.

मंगळवारी सकाळी कोल्हापूरहून गगनबावडामार्गे अवजड वाहने वैभववाडीत पोहोचत गेल्या ८-९ दिवसांपासून वैभववाडीत मुक्काम ठोकलेल्या वाहनांनी कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. गगनबावडा कोल्हापूर मार्ग सुरू झाल्यामुळे व्यापारी सुखावले आहेत.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग