शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: July 8, 2024 17:28 IST

अपयशी मंत्री असल्याची टीका

सावंतवाडी : मित्रपक्षात असलेल्या राजन तेलींनी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना शिक्षण खात्यातले काही कळत नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरुन काढून टाकावे, अशी मागणी करुन त्यांना जोरदार चपराक दिली आहे. त्यामुळे केवळ नैतिकता म्हणून तरी केसरकरांनी आता तरी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. दरम्यान, काल झालेल्या मुसळधार पावसात अनेकांचे नुकसान झाले. मात्र केसरकर मतदार संघात असताना सुध्दा त्यांनी नुकसान झालेल्यांची साधी विचारपुस सुध्दा केली नाही. तर दुसरीकडे त्यांचा वचक नसल्यामुळे आपती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली आहे, अशी टीका राऊळ यांनी केली.राजन तेली यांनी मंत्री केसरकरांची हकालपट्टी करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर  राऊळ यांनी टिका करतना केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी न करता महायुतीतील नेते करत आहेत यावरून केसरकर यांची नैतिकता कळली आहे असेही राऊळ म्हणाले.दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो यामध्ये बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. दुकानदारांचे मोठे नुकसान होते. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात नुकसान होते. तेव्हा केसरकर यांनी हे करू, ते करू असे म्हटले. मात्र काहीच केले नाही.

ते मुंबईचे निवासी झाले आहेत. आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. शिक्षणमंत्री असतानाही डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी पाणी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत अशी टीका ही राऊळ यांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणDeepak Kesarkarदीपक केसरकर