शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खरीप हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना अवजारांची प्रतीक्षा, काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:47 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरिप हंगाम संपत आला तरी राज्य शासनाच्या कृषी अधीक्षक विभागातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना घेराव घालून जाब विचारला.

ठळक मुद्दे खरीप हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना अवजारांची प्रतीक्षा, काँग्रेस आक्रमकजिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव घालून जाब विचारला

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात खरिप हंगाम संपत आला तरी राज्य शासनाच्या कृषी अधीक्षक विभागातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना घेराव घालून जाब विचारला.

कृषी अवजारांसाठी उद्दीष्ट व निधी प्राप्त नसल्याने आपण कृषी अर्जांना मंजुरी कशी द्यायची? असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला. मात्र, जिल्हाध्यक्ष सावंत यांनी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेत त्यानुसार कार्यवाही करा व येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या कृषी अवजारांसाठीच्या अर्जाला पूर्व परवानगी द्यावी, अन्यथा आपल्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या दालनात घेवून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.जिल्हयातील शेतकऱ्यांना अद्याप कृषी अवजारे मिळाली नसल्याने जिल्हा काँग्रेसने कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना धारेवर धरले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रांतीक सदस्य तथा प्रवक्ते काका कुडाळकर, माजी सभापती बाळा गावडे, महिला काँग्रेस राज्य सदस्य विभावरी सुकी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सिद्धेश परब, संतोष तावडे, अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज नाईक, उल्हास मणचेकर, सुधीर मल्लार, विनायक वर्णेकर, मोसील मुल्ला, विजय प्रभू अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अन्यथा तीव्र आंदोलन छेडूआपण कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेऊन कार्यवाही करावी. तसेच याबाबत तालुका कृषी अधिका-यांना शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्व परवानगी देण्यात यावी अशी सूचना शेळके यांना विकास सावंत यांनी केली. उद्दीष्ट व अनुदान नसेल तर काहीच फायदा होणार नाही असे उत्तर शिवाजी शेळके यांनी दिले. यावर काँग्रेस शिष्टमंडळ आक्रमक होत शेळके यांना धारेवर धरले. अशी बेजबाबदार विधाने करताना आपल्याला काहीच का वाटत नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सावंत यांनी दिला. 

टॅग्स :agricultureशेतीsindhudurgसिंधुदुर्ग