शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

पर्यावरण दिन विशेष: पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारूया; पर्यावरणाची हानी भावी पिढीसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ

महादेव भिसेआंबोली : गेल्या काही दशकांमध्ये पर्यावरणाची हानी झाली आहे. भावी पिढीसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे योग्यवेळी शहाणे होऊन प्रत्येकाने पर्यावरण या विषयाला प्रथम प्राधान्य देऊन नंतरच इतर विषय शिकले पाहिजे. पर्यावरण टिकण्यासाठी झटले पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. यात हवा, पाणी, जमीन आणि जीवाणूंचा समावेश होतो. आपण पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सोप्या उपाययोजना केल्यास पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, वृक्ष, माणूस, इतर वन्य प्राणी, आपल्या सभोवताली असलेले अनेक प्रकारचे वायू, निर्जीव घटक या सर्वांनी मिळून बनलेले वातावरण. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये मानवाचा चुकीच्या पद्धतीने झालेला हस्तक्षेप हा पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे.आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ झालेला आहे.

वन्यप्राण्यांसमवेत निर्जीव घटकांचेही संवर्धन हवेअगदी खाल्लेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा खिशामध्ये ठेवून तो कचराकुंडीत टाकण्याइतकी जनजागृती येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड असेल, नदी संवर्धन असेल, वन्य प्राणी संवर्धन असेल, इतकेच कशाला तर निर्जीव घटकांचे संवर्धनही तितकेच गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो, अन्यथा हा समतोल ढासळून निसर्गाच्या पर्यावरणाच्या क्रोधाला सामोरे जावेच लागणार आहे. पूर, वादळवारा, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक अशा प्रकारचे निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला भविष्यात बघावे लागेल. - प्रशांत जाधव, वन्यप्राणी छायाचित्रकार व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

नागरिकांमध्ये जनजागृती हवीजास्तीत जास्त झाडे लावली गेली पाहिजेत. पाणी योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, ते साठवले गेले पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. अनावश्यक ऊर्जा म्हणजेच वीज वापरण्यावरही बंधन पाहिजे. पर्यावरणाविषयी प्रत्येक नागरिकामध्ये जनजागृती कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.  - राकेश देऊलकर,  पर्यावरण अभ्यासक

प्रदूषणकारी प्रकल्पांना बंदी हवीवाढते प्रदूषणकारी प्रकल्प यावर कायदेशीर बंधन आणणे गरजेचे आहे. अनधिकृत प्रदूषणकारी प्रकल्प बंद केले गेले पाहिजेत, जे प्रकल्प नदी प्रदूषित करत आहेत. त्या प्रकल्पांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येऊन कोणते ना कोणते पाऊल उचलून पर्यावरण संवर्धनास मदत केली पाहिजे.  - रोहन कोरगावकर, पर्यावरण अभ्यासक, मुंबई (लालबाग)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण