शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पर्यावरण दिन विशेष: पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारूया; पर्यावरणाची हानी भावी पिढीसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ

महादेव भिसेआंबोली : गेल्या काही दशकांमध्ये पर्यावरणाची हानी झाली आहे. भावी पिढीसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे योग्यवेळी शहाणे होऊन प्रत्येकाने पर्यावरण या विषयाला प्रथम प्राधान्य देऊन नंतरच इतर विषय शिकले पाहिजे. पर्यावरण टिकण्यासाठी झटले पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. यात हवा, पाणी, जमीन आणि जीवाणूंचा समावेश होतो. आपण पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सोप्या उपाययोजना केल्यास पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, वृक्ष, माणूस, इतर वन्य प्राणी, आपल्या सभोवताली असलेले अनेक प्रकारचे वायू, निर्जीव घटक या सर्वांनी मिळून बनलेले वातावरण. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये मानवाचा चुकीच्या पद्धतीने झालेला हस्तक्षेप हा पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे.आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ झालेला आहे.

वन्यप्राण्यांसमवेत निर्जीव घटकांचेही संवर्धन हवेअगदी खाल्लेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा खिशामध्ये ठेवून तो कचराकुंडीत टाकण्याइतकी जनजागृती येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड असेल, नदी संवर्धन असेल, वन्य प्राणी संवर्धन असेल, इतकेच कशाला तर निर्जीव घटकांचे संवर्धनही तितकेच गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो, अन्यथा हा समतोल ढासळून निसर्गाच्या पर्यावरणाच्या क्रोधाला सामोरे जावेच लागणार आहे. पूर, वादळवारा, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक अशा प्रकारचे निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला भविष्यात बघावे लागेल. - प्रशांत जाधव, वन्यप्राणी छायाचित्रकार व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

नागरिकांमध्ये जनजागृती हवीजास्तीत जास्त झाडे लावली गेली पाहिजेत. पाणी योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, ते साठवले गेले पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. अनावश्यक ऊर्जा म्हणजेच वीज वापरण्यावरही बंधन पाहिजे. पर्यावरणाविषयी प्रत्येक नागरिकामध्ये जनजागृती कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.  - राकेश देऊलकर,  पर्यावरण अभ्यासक

प्रदूषणकारी प्रकल्पांना बंदी हवीवाढते प्रदूषणकारी प्रकल्प यावर कायदेशीर बंधन आणणे गरजेचे आहे. अनधिकृत प्रदूषणकारी प्रकल्प बंद केले गेले पाहिजेत, जे प्रकल्प नदी प्रदूषित करत आहेत. त्या प्रकल्पांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येऊन कोणते ना कोणते पाऊल उचलून पर्यावरण संवर्धनास मदत केली पाहिजे.  - रोहन कोरगावकर, पर्यावरण अभ्यासक, मुंबई (लालबाग)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण