शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

इन्सुली ग्रामस्थांचा सरपंचांना घेराओ

By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST

आंदोलनाचा इशारा : सूत गिरण परिसरातील बेकायदेशीर फलक हटविण्याची मागणी

मडुरा : इन्सुली येथील वादग्रस्त सूत गिरण जमिनीच्या परिसरात बेकायदेशीररित्या लावण्यात आलेले जाहिरात फलक तातडीने हटवावेत, यासाठी आज सूत गिरण संघर्ष समितीच्यावतीने सरपंच अश्विनी परब यांना घेराओ घालण्यात आला. यावेळी भूमिपुत्र आक्रमक झाल्याने सरपंच परब यांनी स्वत: ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांदा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर, येत्या आठ दिवसांत जाहिरात फलक न हटविल्यास आंदोलन करण्यात येईल, इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विकास केरकर यांनी यावेळी दिला.सरपंच परब यांनी जाहिरात फलक हटविण्याबाबत संबंधितांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजाविण्यात आली असून आठ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे यावेळी सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने हे फलक हटविण्याची मागणी केल्याने वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सूत गिरण परिसरातील जाहिरात फलक तातडीने काढा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. मात्र, सरपंच परब यांनी स्वत:च कार्यालयाला टाळे ठोकल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सरकारी कार्यालयाला टाळे ठोकणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर कार्यालयाचे टाळे खोलण्यात आले. परब यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहिरात फलक हटविण्याबाबत नोटीस दिल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसांत फलक न हटविल्यास प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा विकास केरकर यांनी यावेळी दिला. यावेळी इन्सुली उपसरपंच बंड्या पालव, तेजस पालव, नलू मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप सावंत, संदीप कोठावळे, नंदकिशोर कोठावळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)परब यांना जाब विचारलाइन्सुली येथील सूत गिरण परिसरातील जमीन वादग्रस्त असून, याबाबत सूत गिरण प्रशासन व स्थानिक भूमिपुत्र यांच्यात गेली कित्येक वर्षे संघर्ष सुरूआहे. यासाठी संघर्ष समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलने उभारण्यात आली. इन्सुली जिल्हा परिषद रस्त्याच्यानजीक तसेच माडभाकरवाडी परिसरात कंपनीच्यावतीने विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना संघर्ष समितीने हरकत घेतली. याबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी विकास केरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र ग्रामपंचायत कार्यालयानजीक जमा झाले. याबाबत सरपंच अश्विनी परब यांना जाब विचारण्यात आला.