शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:45 IST

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कील

दोडामार्ग : विजघर बांबर्डे परिसरात वावर असलेला टस्कर व त्याचे पिल्लू आता थेट लोकवस्तीत घुसत असल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या हत्तींमुळे जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ लोकांवर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा टस्कर पिल्लासह लोकवस्तीत घुसला. त्यामुळे लोकांची अक्षरशः दाणादाण उडाली आणि पळापळ सुरू झाली. कधी हत्ती आक्रमक तर कधी ग्रामस्थ त्याच्या आक्रमकपणावर भारी पडत होते. हा थरार जवळपास दीड तास सुरू होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर टस्कराला पिल्लासहित जंगलात हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले आणि जीवन-मृत्यूच्या संघर्षात काही काळापुरता का होईना, लोकांचा विजय झाला.बांबर्डे, घाटीवडे परिसरात दाखल झालेल्या टस्कर व हत्तीच्या पिल्लाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी या हत्तींनी आपला मोर्चा तेरवण-मेढे, मोर्ले, घोटगेवाडी गावाकडे वळविला होता. तेथील केळी, नारळ, सुपारी, काजू बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर पाळये येथे जात तेथेही फळबागायतींचे नुकसान केले. हे हत्ती पुन्हा बांबर्डे परिसरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६:३० वा.च्या सुमारास टस्कर व पिल्लू लोकवस्ती शेजारी असलेल्या फळबागयतीत घुसले. यावेळी टस्कर एका भल्या मोठ्या माडाला सोंडेने जमीनदोस्त करण्याच्या प्रयत्नात होता.यादरम्यान हत्ती लोकवस्तीत आल्याचे समजताच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. आक्रमक रूप धारण केलेल्या हत्तींना जंगलात हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात कधी हत्ती आक्रमक तर त्याच्या आक्रमकतेवर कधी जिवाच्या आकांताने त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणारे लोक भारी पडत होते. हा थरार साधारणतः दीड तास चालला आणि अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला.

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कीलसध्या काजूचा हंगाम असल्याने व हत्ती दिवसाढवळ्या फळ बागायतीत येत असल्याने बागायतीत जावे की नाही, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाण मांडून उभा आहे. कारण, टस्करासोबत एक पिल्लू आहे. तसेच भल्या मोठ्या टस्कराचे सुळे अतिशय लांब आहेत. बागायतीत घुसलेल्या या हत्तींना हुसकावताना पिल्लाच्या संरक्षणार्थ टस्कर चाल करून येत आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावणे जोखमीचे आहे. हत्तींचा वावर आता वाढत चालला असून, वनविभागाने या हत्तींना पिटाळून लावावे व आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग