शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:45 IST

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कील

दोडामार्ग : विजघर बांबर्डे परिसरात वावर असलेला टस्कर व त्याचे पिल्लू आता थेट लोकवस्तीत घुसत असल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या हत्तींमुळे जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ लोकांवर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा टस्कर पिल्लासह लोकवस्तीत घुसला. त्यामुळे लोकांची अक्षरशः दाणादाण उडाली आणि पळापळ सुरू झाली. कधी हत्ती आक्रमक तर कधी ग्रामस्थ त्याच्या आक्रमकपणावर भारी पडत होते. हा थरार जवळपास दीड तास सुरू होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर टस्कराला पिल्लासहित जंगलात हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले आणि जीवन-मृत्यूच्या संघर्षात काही काळापुरता का होईना, लोकांचा विजय झाला.बांबर्डे, घाटीवडे परिसरात दाखल झालेल्या टस्कर व हत्तीच्या पिल्लाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी या हत्तींनी आपला मोर्चा तेरवण-मेढे, मोर्ले, घोटगेवाडी गावाकडे वळविला होता. तेथील केळी, नारळ, सुपारी, काजू बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर पाळये येथे जात तेथेही फळबागायतींचे नुकसान केले. हे हत्ती पुन्हा बांबर्डे परिसरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६:३० वा.च्या सुमारास टस्कर व पिल्लू लोकवस्ती शेजारी असलेल्या फळबागयतीत घुसले. यावेळी टस्कर एका भल्या मोठ्या माडाला सोंडेने जमीनदोस्त करण्याच्या प्रयत्नात होता.यादरम्यान हत्ती लोकवस्तीत आल्याचे समजताच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. आक्रमक रूप धारण केलेल्या हत्तींना जंगलात हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात कधी हत्ती आक्रमक तर त्याच्या आक्रमकतेवर कधी जिवाच्या आकांताने त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणारे लोक भारी पडत होते. हा थरार साधारणतः दीड तास चालला आणि अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला.

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कीलसध्या काजूचा हंगाम असल्याने व हत्ती दिवसाढवळ्या फळ बागायतीत येत असल्याने बागायतीत जावे की नाही, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाण मांडून उभा आहे. कारण, टस्करासोबत एक पिल्लू आहे. तसेच भल्या मोठ्या टस्कराचे सुळे अतिशय लांब आहेत. बागायतीत घुसलेल्या या हत्तींना हुसकावताना पिल्लाच्या संरक्षणार्थ टस्कर चाल करून येत आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावणे जोखमीचे आहे. हत्तींचा वावर आता वाढत चालला असून, वनविभागाने या हत्तींना पिटाळून लावावे व आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग