शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:45 IST

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कील

दोडामार्ग : विजघर बांबर्डे परिसरात वावर असलेला टस्कर व त्याचे पिल्लू आता थेट लोकवस्तीत घुसत असल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या हत्तींमुळे जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ लोकांवर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा टस्कर पिल्लासह लोकवस्तीत घुसला. त्यामुळे लोकांची अक्षरशः दाणादाण उडाली आणि पळापळ सुरू झाली. कधी हत्ती आक्रमक तर कधी ग्रामस्थ त्याच्या आक्रमकपणावर भारी पडत होते. हा थरार जवळपास दीड तास सुरू होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर टस्कराला पिल्लासहित जंगलात हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले आणि जीवन-मृत्यूच्या संघर्षात काही काळापुरता का होईना, लोकांचा विजय झाला.बांबर्डे, घाटीवडे परिसरात दाखल झालेल्या टस्कर व हत्तीच्या पिल्लाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी या हत्तींनी आपला मोर्चा तेरवण-मेढे, मोर्ले, घोटगेवाडी गावाकडे वळविला होता. तेथील केळी, नारळ, सुपारी, काजू बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर पाळये येथे जात तेथेही फळबागायतींचे नुकसान केले. हे हत्ती पुन्हा बांबर्डे परिसरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६:३० वा.च्या सुमारास टस्कर व पिल्लू लोकवस्ती शेजारी असलेल्या फळबागयतीत घुसले. यावेळी टस्कर एका भल्या मोठ्या माडाला सोंडेने जमीनदोस्त करण्याच्या प्रयत्नात होता.यादरम्यान हत्ती लोकवस्तीत आल्याचे समजताच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. आक्रमक रूप धारण केलेल्या हत्तींना जंगलात हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात कधी हत्ती आक्रमक तर त्याच्या आक्रमकतेवर कधी जिवाच्या आकांताने त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणारे लोक भारी पडत होते. हा थरार साधारणतः दीड तास चालला आणि अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला.

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कीलसध्या काजूचा हंगाम असल्याने व हत्ती दिवसाढवळ्या फळ बागायतीत येत असल्याने बागायतीत जावे की नाही, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाण मांडून उभा आहे. कारण, टस्करासोबत एक पिल्लू आहे. तसेच भल्या मोठ्या टस्कराचे सुळे अतिशय लांब आहेत. बागायतीत घुसलेल्या या हत्तींना हुसकावताना पिल्लाच्या संरक्षणार्थ टस्कर चाल करून येत आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावणे जोखमीचे आहे. हत्तींचा वावर आता वाढत चालला असून, वनविभागाने या हत्तींना पिटाळून लावावे व आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग