शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

By सुधीर राणे | Updated: December 17, 2022 16:33 IST

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ...

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे. त्यासाठी २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्याकडे केली असून त्यादृष्टीने लवकरच मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जठार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात बारसू रिफायनरी प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी मी अनेक वर्षे काम करत आहे. कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी हा रिफायनरी प्रकल्प आवश्यक आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी मिळेल. त्यासाठी कौशल्य विकास(स्किल डेव्हलपेंट) विभागाच्यावतीने २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. त्यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू असे सांगितले आहे. या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहतील. रिफायनरी प्रकल्प झाल्यास कोकणचा चेहरा मोहरा बदलून जाईल. येथील अर्थकारण बदलेल आणि नोकरीसाठी येथील तरुणांना मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही. रिफायनरी प्रकल्पात इंजिनियर, फिटर, वायरमन अशा प्रशिक्षित लोकांची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये आवश्यक असे नवे ट्रेड सुरू करून येथील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जठार यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पBJPभाजपा