शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

By सुधीर राणे | Updated: December 17, 2022 16:33 IST

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ...

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे. त्यासाठी २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्याकडे केली असून त्यादृष्टीने लवकरच मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.कणकवली येथील भाजपा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जठार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात बारसू रिफायनरी प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी मी अनेक वर्षे काम करत आहे. कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी हा रिफायनरी प्रकल्प आवश्यक आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी मिळेल. त्यासाठी कौशल्य विकास(स्किल डेव्हलपेंट) विभागाच्यावतीने २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. त्यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू असे सांगितले आहे. या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहतील. रिफायनरी प्रकल्प झाल्यास कोकणचा चेहरा मोहरा बदलून जाईल. येथील अर्थकारण बदलेल आणि नोकरीसाठी येथील तरुणांना मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही. रिफायनरी प्रकल्पात इंजिनियर, फिटर, वायरमन अशा प्रशिक्षित लोकांची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये आवश्यक असे नवे ट्रेड सुरू करून येथील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जठार यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पBJPभाजपा