शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आपत्कालीन बैठकीत वीजवितरण, बांधकाम विभागावर नागरिकांनी व्यक्त केला रोष

By अनंत खं.जाधव | Updated: July 24, 2023 15:46 IST

सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत ...

सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत विभागासह बांधकाम विभागावर आपला रोष व्यक्त केला. त्यावर केसरकर यांनी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहाणी करावी आणि त्याच्या समस्या सोडवाव्यात अशा सुचना केल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक काल, रविवारी उशिरा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्षमी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी मच्छीद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, आपत्कालीनच्या राजश्री सामंत, सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, बबन राणे, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यावेळी दमदार पाऊस झाला. मात्र प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेतल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. मात्र प्रशासनाने अजून ही चांगले काम केले पाहिजे. ज्या ठिकाणी खरोखरच आपत्ती येईल तिथे लोकांमध्ये जागृती करावी. शाळा रिकामी करून त्याना राहण्याची व्यवस्था करावी असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी बैठकीत येवून विद्युत विभागावर आपली नाराजी व्यक्त केली. बांदाचे सरपंच प्रियंका नाईक यांनी तर गावात विजेची समस्या असताना त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ओटवणे येथे विद्युत वाहिनी पडून मुलाचा मृत्यू झाला तसेच अनेक गावात वीज वाहिनी पडून गुरे दगावली अश्या तक्रारी केल्या. यावर मंत्री केसरकर यांनी विद्युत विभागाने गावात जाऊन स्वत: पाहणी करावी अशी सुचना केली.आंबोली घाटात दरड कोसळली ती काढण्यासाठी बारा तास लागले. याबाबत सर्वगौड यांनी जेसीबी चालक दरड काढण्यास घाबरत होता असे उत्तर दिले. तर मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी दोडामार्ग मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते खराब होतील यावर उपाय योजना कराव्यात अशी सुचना केली. तसेच बांदा तसेच ओटवणे आंबोली चौकुळ येथे कायमस्वरूपी एक होडी ठेवण्यात यावी अशी सुचना महसूल प्रशासनास केली तसेच पूर परस्थीतीच्या पाश्र्वभूमीवर बांदा येथे एक निवारा शेड उभी राहिल्यास दुकान दाराच्या सामानाचे नुकसान होणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक घराचे नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 159 घराचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.यातील 110 घरे ही सावंतवाडी तालुक्यातील असल्याचे प्रशासनासाकडून सांगण्यात आले.केसरकर स्वत: आर्थिक मदत देणारसावंतवाडी तालुक्यात जी घरे कोसळून नुकसान झाले आहे या घरांना प्रशासन मदत देणार आहे. मात्र माझ्याकडून ही थोडी फार नुकसान भरपाई दिली जाईल असे मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकर