शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:35 IST

कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देरेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत विनायक राऊत यांचे मानले आभार; १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे आरक्षण कालावधी कमी करण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहारकेला. याबद्दल डी. के. सावंत यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.गेल्या बावीस वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्या असूनही रेल्वे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने नाईलाजाने आम्हांला अनेकवेळा विविध आंदोलने करून लक्ष वेधून घ्यावे लागले. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या कोकणी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून सर्व दृष्टीने गैरसोयीच्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांची चारही बाजूंनी लूट करूनही दखल घ्यायला प्रशासन तयार नाही. कुठच्याही मागणीसाठी रेल्वे बोर्डाकडे बोट दाखविले जाते. हे जर खरे असेल तर प्रवाशांच्या मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी काय पत्रव्यवहार केला ते कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर करावे.आमच्या माहितीप्रमाणे कुठलेही वरिष्ठ नियंत्रण बोर्ड प्रशासनाशी विचारविनिमय केल्याशिवाय निर्णय घेत नाही. स्थानिक समस्या दिल्लीत बसून समजत नाहीत. असे असताना कोकण रेल्वे प्रशासन महंमद तुघलकाच्या भूमिकेत आहे. याची दखल घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सावंत म्हणाले.वास्तविक रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सोडविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे कमीपणाचे मानतात आणि म्हणूनच प्रवाशांच्या या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने १ मे रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एल्गार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्राप्त परिस्थितीत देशावरील कोरोना संकट लक्षात घेता हे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.याची दखल घेऊन खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी आमच्या रास्त मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात येत आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वे