शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:35 IST

कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देरेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत विनायक राऊत यांचे मानले आभार; १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे आरक्षण कालावधी कमी करण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहारकेला. याबद्दल डी. के. सावंत यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.गेल्या बावीस वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्या असूनही रेल्वे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने नाईलाजाने आम्हांला अनेकवेळा विविध आंदोलने करून लक्ष वेधून घ्यावे लागले. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या कोकणी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून सर्व दृष्टीने गैरसोयीच्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांची चारही बाजूंनी लूट करूनही दखल घ्यायला प्रशासन तयार नाही. कुठच्याही मागणीसाठी रेल्वे बोर्डाकडे बोट दाखविले जाते. हे जर खरे असेल तर प्रवाशांच्या मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी काय पत्रव्यवहार केला ते कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर करावे.आमच्या माहितीप्रमाणे कुठलेही वरिष्ठ नियंत्रण बोर्ड प्रशासनाशी विचारविनिमय केल्याशिवाय निर्णय घेत नाही. स्थानिक समस्या दिल्लीत बसून समजत नाहीत. असे असताना कोकण रेल्वे प्रशासन महंमद तुघलकाच्या भूमिकेत आहे. याची दखल घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सावंत म्हणाले.वास्तविक रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सोडविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे कमीपणाचे मानतात आणि म्हणूनच प्रवाशांच्या या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने १ मे रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एल्गार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्राप्त परिस्थितीत देशावरील कोरोना संकट लक्षात घेता हे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.याची दखल घेऊन खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी आमच्या रास्त मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात येत आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वे