शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

अन्नाच्या शोधात हत्तींची गावोगावी भटकंती, तिलारी खोऱ्यात पुनश्च आगमन; शेतकरी धास्तावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:37 IST

महिनाभरापूर्वी दोन पिल्ले आणि नर-मादी असा चार हत्तींचा कळप वीजघर परिसरात दृष्टीस पडला होता. मात्र, त्यानंतर काही दिवस त्यांची तिलारी खोऱ्यात जागा नव्हती. परंतु, दोन दिवसांपूर्वी हा कळप पुनश्च तिलारीच्या खोऱ्यात दाखल झाला.

दोडामार्ग : दोन पिल्लांसह दोन हत्तीणींनी पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यात आपली हजेरी लावली. अन्नाच्या शोधात ते गावोगावी भटकंती करीत असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. केर गावातून हे हत्ती सोमवारी थेट मोर्ले गावात दाखल झाले. ते दिवसाही भटकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यावर हत्तींचे संकट पुन्हा गडद झाले आहे.

महिनाभरापूर्वी दोन पिल्ले आणि नर-मादी असा चार हत्तींचा कळप वीजघर परिसरात दृष्टीस पडला होता. मात्र, त्यानंतर काही दिवस त्यांची तिलारी खोऱ्यात जागा नव्हती. परंतु, दोन दिवसांपूर्वी हा कळप पुनश्च तिलारीच्या खोऱ्यात दाखल झाला. केर गावात एका तळीत हा कळप डुंबताना दृष्टीस पडला. गेले दोन दिवस केर गावच्या परिसरात त्यांचा वावर होता. मात्र, सोमवारी रात्री हत्तींच्या या कळपाने आपला मोर्चा मोर्ले गावाच्या दिशेने वळविला आहे.सोमवारी रात्री हत्ती केर गावातून मोर्ले गावात उतरले आणि ज्या ठिकाणी वनविभागाने मधमाशांच्या पेट्या बसविल्या होत्या त्यांच्या मधूनच हत्तींनी मोर्ले गावात शिरकाव केला आणि वनविभागाचे हे विधान खोडून काढले. गेली कित्येक वर्षे वनविभाग हत्तींना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. मात्र, त्या सर्व उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत.

मधुमक्षिका पेट्यांचा कोणताही परिणाम नाही

हत्ती कितीही वर्षांनी परतले तरीही ते पूर्वीच्या मार्गानेच भ्रमंती करीत असतात. त्यामुळे मोर्ले गावात वनविभागाने हत्ती येतात, त्याच मार्गावर मधुमक्षिका पेट्या बसविल्या आहेत. मधमाशीला हत्ती घाबरतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी मोर्ले गावात हत्तींच्या मार्गावर मधमाशांच्या पेट्या बसविल्या. परंतु त्याचा काहीही परिणाम हत्ती येण्यावर झाला नाही.

शेतकरी धास्तावला

यापूर्वी या परिसरात मोठ्या हत्तींचा वावर होत असे. मात्र, यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पिल्ले आहेत. आणि हा कळप अन्नाच्या शोधासाठी दिवसाढवळ्या भटकंती करीत आहे. जास्तकरून शेतीच्या परिसरात त्यांची वर्दळ असते. त्यांना हाकलण्यासाठी उपाययोजना केली तर त्यांच्या सोबत पिल्ले असल्याने ते माणसावर आक्रमण करणार या भीतीने आता शेतकरी धास्तावला आहे. त्यांच्यापासून शेतीचा बचाव करणे शेतकऱ्याला कठीण झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग