शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात भरली गेली तब्बल पावणेतीन कोटींची वीजबिले

By admin | Updated: November 14, 2014 23:17 IST

महावितरणला २ कोटी ८७ लाख ७३ हजार २४९ रूपयांचा महसूल

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -तासन्तास रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा तातडीने भरता यावे, यासाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात आली. २४ तास वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने कोकण झोनमध्ये पाच एटीपी केंद्र सुरू केली आहेत. या पाचही केंद्रात अवघ्या एका महिन्यात २४ हजार ७८३ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे महावितरणला २ कोटी ८७ लाख ७३ हजार २४९ रूपयांचा महसूल मिळाला आहे.आॅक्टोबर महिन्यात रत्नागिरी विभागातील १६ हजार ५६० ग्राहकांनी २ कोटी २९ लाख ४५ हजार ७७७ रूपये एटीपी केंद्रात भरले आहेत. सप्टेंबर महिन्यात १६ हजार २०५ ग्राहकांनी याचा लाभ घेतला होता. त्यामुळे १ कोटी ९२ लाख ८३ हजार ४१५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार २२३ ग्राहकांनी एटीपी केंद्रात ५८ लाख २७ हजार ४७२ रूपये भरले होते. सप्टेंबरमध्ये ८ हजार ९३६ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ६९ लाख ७३ हजार ३२६ रूपये भरण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यातील रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पन्न वाढल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरी शहरात नाचणे येथे सुरू असलेल्या एटीपी केंद्राला देवरूख, रत्नागिरी ग्रामीण १ व २, राजापूर १ व २, रत्नागिरी शहर, राजापूर, लांजा, संगमेश्वर विभाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अन्य कामकाजासाठी आलेल्या ग्राहकाना एटीपी केंद्राव्दारे बिल भरणे सोपे होते. रत्नागिरी केंद्रामध्ये ११ हजार ४२७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ८१ लाख ६ हजार ८७७ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. चिपळूण केंद्रामध्ये चिपळूण शहर व ग्रामीण, सावर्डे, गुहागर हा विभाग जोडण्यात आला आहे. चिपळूण विभागातील ४२०७ ग्राहकांनी लाभ घेतल्यामुळे ३८ लाख २८ हजार ८९० रूपये प्राप्त झाले आहेत. खेड केंद्राला खेड, लोटे, दापोली १ व २ जोडले आहेत. ९२६ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे १० लाख १० हजार १० रूपये प्राप्त झाले आहेत.कणकवली विभागातून ५ हजार २३५ ग्राहकांनी ३६ लाख ७० हजार ६४२ रूपये, मालवण विभागातून २ हजार ९८८ ग्राहकांनी २१ लाख ५६ हजार ८३० रूपयांचा महसूल भरला आहे. एटीपी केंद्रामुळे वीजबिल भरणे सोपे झाले आहे. तासनतास रांगेत तिष्ठत उभे राहण्यापेक्षा लवकर व सुटीच्या दिवशीही बिल भरणे शक्य होत आहे.ग्राहकांचा वेळ वाचतो. तसेच सुटीच्या दिवशी वीजबिल भरणे सुकर होत असल्यामुळे एटीपी केंद्राकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ग्राहकांच्या हितार्थ रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथे आणखी एक एटीपी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वीजबिल भरणे सोपे होईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व सावंतवाडी येथेही स्वतंत्र दोन स्वयंचलित वीजबिल केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- एस. टी. नागटिळक, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.