शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शिवसेनेसाठी शिवधनुष्यच...!

By admin | Updated: April 8, 2015 23:58 IST

२00२ साली शिवसेना-भाजपने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. या निवडणुकीआधी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ५२ दिवसांचा विक्रमी संप केला होता.

मनोज मुळ्ये - रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्ह्याच्या तळागाळात भक्कम पाया असलेल्या शिवसेनेने सलग तिसऱ्यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये असा प्रयत्न करताना शिवसेनेला अल्प यशावरच समाधान मानावे लागले होते. आता नव्या दमाने या निवडणुकीत उतरण्याचा चंग शिवसेनेने बांधला असला तरी या निवडणुका आल्यानंतरच सहकारात डोकावणाऱ्या शिवसेनेला याहीवेळी कितीसे यश मिळेल, ही शंका आहे. याआधीच्या दोन निवडणुकांप्रसंगी जिल्हा बँकेच्या सत्ताधारी पॅनेलची हालत अतिशय नाजूक होती. मात्र, त्याचा फायदा उठवू न शकलेली शिवसेनेला आताची निवडणूकही शिवधनुष्य उचलण्याइतकीच अवघड ठरणार आहे.जिल्ह्यात सहकार क्षेत्र फारसे रूजलेले नाही. सहकार म्हणून जे काही दिसते त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कब्जा आहे. स्थापनेपासून ही बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. माजी खासदार शामराव पेजे, माजी आमदार शिवाजीराव जड्यार, गुहागरचे बापू आरेकर, माजी खासदार गोविंदराव निकम, मोहन इंदुलकर यांनी अनेक वर्षे बँक काँग्रेस (आणि नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी)च्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.२00२ साली शिवसेना-भाजपने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. या निवडणुकीआधी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ५२ दिवसांचा विक्रमी संप केला होता. सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तीव्र होते. त्यामुळे शिवसेना-भाजप त्या निवडणुकीत आपले पाय रोवेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र २७ संचालकांमध्ये अ‍ॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), हेमचंद्र माने (रत्नागिरी), दिलीप जाधव (संगमेश्वर) आणि सुधीर कालेकर (दापोली) या चौघांनाच यश मिळाले.त्यानंतरच्या म्हणजेच २00७च्या निवडणुकीत तर सत्ताधारी पॅनेल फारच अडचणीत होते. चुकीच्या व्यवहारांमुळे ६३ टक्के कर्जे एनपीएमध्ये गेली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या कर्ज व्यवहारांवर टाच आणली होती. सभासद संस्थांना लाभांश मिळत नव्हता. त्यामुळे ती निवडणूक सत्ताधारी पॅनेलला जड जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. अर्थात त्यावेळी युतीच्या परिवर्तन पॅनेलमधील भाजप सदस्यांना आपल्यासोबत घेण्याची शक्कल सत्ताधाऱ्यांनी लढवली. शिवसेना एकटी पडली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे सुधीर कालेकर (दापोली) आणि राजेश खेडेकर (रत्नागिरी) हे दोनच संचालक निवडून आले. सत्ताधारी पॅनेलमधून बंडखोरी केलेले तिघेजण निवडून आले आणि सहकार पॅनेलचे २२ संचालक विजयी झाले. या निवडणुकीतही शिवसेनेला दोनच जागांवर समाधान मानावे लागले.जिल्हा बँकेसाठी आताच्या घडीला १ हजार १८९ मतदार पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात ३८0 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. या संस्थांवर पूर्वापार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरताना प्राथमिक टप्प्यात या संस्थांना बँकेकडून मतदार निश्चितीच्या ठरावासाठी नमुना पत्र पाठवले जाते. मुळात त्याच टप्प्यावर या निवडणुकीची रणनीती सुरू होते. बँकेच्या सभासद संस्थांमधून मतदानाला येणारा प्रतिनिधी आपल्या बाजूचा असावा, हेच बँकेचे मुलभूत राजकारण आहे. या वाटेवर शिवसेनेने कधी पाऊल टाकलेले नाही. शिवसेनेने यावेळी तिसऱ्यांदा शिवधनुष्य पेलायची तयारी केली आहे. पण ती तयारी उमेदवारी अर्ज भरताना सुरू झाली आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीने मतदार प्रतिनिधी निवडीच्या ठरावात आपली बाजू भक्कम करून घेतली आहे.शिवसेनेनेने सहकार क्षेत्रात कधीही पुरेसे लक्ष दिले नाही. अशा निवडणुकांची तयारी वर्षभर आधीपासून न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावरच त्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न शिवसेनेने याआधी दोनदा केला आणि त्यात त्यांचेच डोके आपटले. आधीच्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधारी पॅनेलच्या नकारात्मक बाजू मोठ्या होत्या. पण गेल्या काही काळात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना बळकटी देत सत्ताधारी पॅनेलने आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळे शिवसेनेला यावेळी जास्तीचेच प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्की. (प्रतिनिधी)शिवसेनेत परत आलेले माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम या निवडणुकीच्यानिमित्ताने सक्रिय झाले आहेत. त्यांच्या संपर्काचा फायदा शिवसेनेला होईल, असे अपेक्षित धरले जात आहे.शिवसेनेच्या पॅनेलमध्ये मोजकेच उमेदवार अनुभवी असल्याने शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.या आधीच्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मुद्दे असतानाही शिवसेनेला मोठे यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता शिवसेना काय करिश्मा करणार, ही बाब लक्षणीय ठरणार आहे.