शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिंधुदुर्गात रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे ४ लाख २२ हजार मनुष्य दिनाचे उद्दिष्ट्य साध्य

सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ४ लाख २२ हजार मनुष्य दिनाचे उद्दिष्ट साध्य करत १२ कोटी ५० लाख रुपये मजुरीवर खर्च केला आहे. तर २०१९-२० या आर्थिक वर्षांत ६ लाख ६८ हजार ९२८ मनुष्य दिनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रारंभ झाला तेव्हापासूनच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना ग्रामीण भागात पोहोचवली गेली. ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षाला १०० दिवस काम देवून त्यांच्या आर्थिक स्त्रोताबरोरबरच गावाचा विकास करून घेणे हे मुख्य कारण या योजनेचे आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड, सिंचन विहीर, शोषखड्डे, बंधारे, गुरांचे गोठे, शौचालय, पायवाटा, रस्ते, कुक्कुटपालन शेड, संरक्षण भिंत यासारखी कामे ग्रामीण मजुरांच्या माध्यमातून केली गेली.

गत आर्थिक वर्षात या योजनेची स्थिती पाहिली तर समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी मनुष्यदिन उद्दिष्ट ४ लाख ९ हजार होते. पैकी ४ लाख २२ हजार पुर्ती करण्यात आली. तर लेबर बजेट खर्च १४ कोटी ५० लाख एवढे होते. पैकी मजुरीवर १२ कोटी ५० लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले.

यात देवगड तालुक्यात मनुष्य दिनाचे ६१  हजार उद्दिष्ट होते पैकी ८८ हजार साध्य करून मजुरीवर २ कोटी १३  लाख ६८ हजार खर्च झाला आहे. दोडामार्ग तालुक्याला २३ हजार मनुष्य दिन उद्दिष्टपैकी २१ हजार साध्य झाले आहे. यावर ५५ लाख १९ हजार रुपए खर्च झाला आहे. कणकवलीत ७५ हजार मनुष्य दिन उद्दिष्टपैकी ५२ हजार साध्य करण्यात आले आहे. यावर १  कोटी ९६ लाख ५७ हजार रुपये खर्च झाले आहेत. 

कुडाळात ६७ हजार मनुष्य दिनापैकी ८४ हजार साध्य झाले असून यावर २ कोटी ६६ लाख मजुरीवर निधी खर्च झाला आहे. मालवण तालुक्यात ८६ हजार मनुष्यदिनापैकी १ लाख १८ हजार साध्य झाले  आहेत. यावर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. सावंतवाडी तालुक्यात ५४ हजार मनुष्य दिनाच्या उद्दिष्टपैकी ३४ हजार पुर्तता झाली असून यावर ९४ लाख खर्च झाला आहे. वैभववाडी तालुक्यात २१ हजार मनुष्यदिन पैकी १० हजार पुर्ती झाली आहे. यावर  २९ लाख २२ हजार रुपये खर्च झाले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात २४ हजार उद्दिष्टपैकी १५ हजार मनुष्य दिन साध्य झाले असून ४० लाख १९ हजार रुपये मनुष्यदिनावर खर्च झाले आहेत.६ लाख ६९ हजाराचे उद्दिष्टचालू आर्थिक वर्षासाठी ६ लाख ६८  हजार ९२८ मनुष्यदिनाचे उद्दिष्ट शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहे. यात देवगड १ लाख १९ हजार ०२४, दोडामार्ग ३० हजार २९६, कणकवली तालुक्याला १ लाख १५ हजार ७२८, कुडाळ  १ लाख २० हजार ५३५ , मालवण १ लाख ३९ हजार ३५७, सावंतवाडी ७२ हजार १६४, वैभववाडी ३० हजार ९८५, वेंगुर्ला ४० हजार ८३९ मनुष्यदिनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकार