शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:06 IST

कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्दे'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !कणकवली पंचायत समितीचा उपक्रम ; ७५०० विद्यार्थ्यांना फायदा

सुधीर राणे

कणकवली  : कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक कामकाज थांबले आहे . शहरी भागातील काही शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे . मात्र , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यामुळे या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविणे शक्य नव्हते . ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही. तर अनेक मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल संच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित होते .त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ' शिक्षण आपल्या दारी ' हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले .

या उपक्रमामधून ऑफलाईन पध्दतीने दर आठवड्याला विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी लेखी प्रश्नसंच पोहोचवायचे. तसेच पूर्वी दिलेले प्रश्नसंच संकलित करून त्याचे परीक्षण करायचे असे ठरले. त्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली . कणकवली तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य केल्याने ६५० शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले . त्यांनी घरोघरी जात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी पंचायत समिती सेस फंडातून शैक्षणिक निधी घेण्याचे ठरविण्यात आले . तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडल्यानंतर सर्वानुमते त्याला मंजुरी मिळाली . याउपक्रमासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक आणि शिक्षक असे सर्वजण कामाला लागले . शिक्षकांकडून स्वाध्याय कार्ड वितरित व संकलित करण्याबरोबरच केंद्रप्रमुख , शिक्षणविस्तार अधिकारी सुध्दा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत स्वाध्याय कार्डची तपासणी करत आहेत.कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून पालक चिंतेत होते . अशा परिस्थितीत ' शिक्षण आपल्या दारी ' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला. शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नसंच घरी येत असल्याने व त्यातील न समजणारे विषय मुले विचारत असल्याने पालकांचाही सहभाग या उपक्रमात वाढू लागला आहे.

एरव्ही शाळेमध्ये काय शिकविले जाते याची सहसा दखल न घेणाऱ्या पालकांना घरी त्यांचीच मुले अभ्यासक्रमावरून प्रश्न विचारू लागली आहेत. त्यामुळे घरामध्ये शैक्षणिक संवाद होऊ लागला. हे या उपक्रमाचे मोठे फलित आहे .पंचायत समितीकडून दर आठवड्याला या उपक्रमासाठी सुमारे ११ हजारांचा निधी खर्च केला जातो . सेस फंडाचा निधी संपल्याने आता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी ठेवलेला निधी या कामासाठी खर्च केला जाणार आहे . ' शिक्षण आपल्या दारी ' उपक्रमात सहभागी होताना तालुक्यातील शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे .

कणकवली तालुक्यातील विविध चेकपोस्टवर कोविड ड्युटी करताना , गावागावातील शाळामध्ये संस्था विलगीकरण झालेल्या चाकरमान्यांकडे लक्ष देण्याचे काम शिक्षक करत होते . हे करत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही , याची खबरदारीही तालुक्यातील शिक्षकांनी घेतली आहे. त्यांचे हे काम वाखाणण्याजोगे आहे.यापुढेही उपक्रम सुरूच राहणार !तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणे शिक्षक , त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे येत्या काळात ' शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम पीडीएफ प्रश्नसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुरू ठेवला जाणार आहे . असे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले.विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक फायदा !कणकवली तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या २२२ शाळांमधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ८ स्वाध्याय कार्ड देण्यात आले आहेत . तर या माध्यमातून ऑगस्टपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे . त्यामुळे 'शिक्षण आपल्या दारी' या उपक्रमाचा चांगला फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो . असे सभापती दिलीप तळेकर म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग