शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:06 IST

कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्दे'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !कणकवली पंचायत समितीचा उपक्रम ; ७५०० विद्यार्थ्यांना फायदा

सुधीर राणे

कणकवली  : कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक कामकाज थांबले आहे . शहरी भागातील काही शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे . मात्र , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यामुळे या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविणे शक्य नव्हते . ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही. तर अनेक मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल संच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित होते .त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ' शिक्षण आपल्या दारी ' हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले .

या उपक्रमामधून ऑफलाईन पध्दतीने दर आठवड्याला विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी लेखी प्रश्नसंच पोहोचवायचे. तसेच पूर्वी दिलेले प्रश्नसंच संकलित करून त्याचे परीक्षण करायचे असे ठरले. त्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली . कणकवली तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य केल्याने ६५० शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले . त्यांनी घरोघरी जात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी पंचायत समिती सेस फंडातून शैक्षणिक निधी घेण्याचे ठरविण्यात आले . तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडल्यानंतर सर्वानुमते त्याला मंजुरी मिळाली . याउपक्रमासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक आणि शिक्षक असे सर्वजण कामाला लागले . शिक्षकांकडून स्वाध्याय कार्ड वितरित व संकलित करण्याबरोबरच केंद्रप्रमुख , शिक्षणविस्तार अधिकारी सुध्दा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत स्वाध्याय कार्डची तपासणी करत आहेत.कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून पालक चिंतेत होते . अशा परिस्थितीत ' शिक्षण आपल्या दारी ' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला. शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नसंच घरी येत असल्याने व त्यातील न समजणारे विषय मुले विचारत असल्याने पालकांचाही सहभाग या उपक्रमात वाढू लागला आहे.

एरव्ही शाळेमध्ये काय शिकविले जाते याची सहसा दखल न घेणाऱ्या पालकांना घरी त्यांचीच मुले अभ्यासक्रमावरून प्रश्न विचारू लागली आहेत. त्यामुळे घरामध्ये शैक्षणिक संवाद होऊ लागला. हे या उपक्रमाचे मोठे फलित आहे .पंचायत समितीकडून दर आठवड्याला या उपक्रमासाठी सुमारे ११ हजारांचा निधी खर्च केला जातो . सेस फंडाचा निधी संपल्याने आता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी ठेवलेला निधी या कामासाठी खर्च केला जाणार आहे . ' शिक्षण आपल्या दारी ' उपक्रमात सहभागी होताना तालुक्यातील शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे .

कणकवली तालुक्यातील विविध चेकपोस्टवर कोविड ड्युटी करताना , गावागावातील शाळामध्ये संस्था विलगीकरण झालेल्या चाकरमान्यांकडे लक्ष देण्याचे काम शिक्षक करत होते . हे करत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही , याची खबरदारीही तालुक्यातील शिक्षकांनी घेतली आहे. त्यांचे हे काम वाखाणण्याजोगे आहे.यापुढेही उपक्रम सुरूच राहणार !तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणे शिक्षक , त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे येत्या काळात ' शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम पीडीएफ प्रश्नसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुरू ठेवला जाणार आहे . असे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले.विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक फायदा !कणकवली तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या २२२ शाळांमधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ८ स्वाध्याय कार्ड देण्यात आले आहेत . तर या माध्यमातून ऑगस्टपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे . त्यामुळे 'शिक्षण आपल्या दारी' या उपक्रमाचा चांगला फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो . असे सभापती दिलीप तळेकर म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग