शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणार

By admin | Updated: June 6, 2016 00:50 IST

दीपक केसरकर : जिल्ह्याच्या विकासासाठी हा केवळ ट्रेलर, पिक्चर बाकी आहे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचा आर्थिक विकास साधताना जिल्ह्याचे कोकणपणही जपले गेले पाहिजे. कोकणची शक्ती आपण अद्याप ओळखू शकलेलो नाही. म्हणूनच येथील लोकांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण पर्यटनात सध्या केवळ पाच समूह घेण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण पर्यटन समूह (गाव) या योजनेत समाविष्ट केले जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्ह्याच्या विकासाचा हा केवळ ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.ग्रामीण पर्यटन आराखडा सादरीकरणानंतर ते पत्रकारांशी शरद कृषी भवन येथे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्गचा विकास करताना येथील निसर्ग पाहता पर्यावरणपूरक प्रकल्प निसर्गाची जपणूक व शाश्वत विकास असावा या दृष्टीने या आराखड्यांचे सादरीकरण रविवारी करण्यात आले असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु त्याच्या अंतर्गत अनेक सुंदर गाव आहेत. या सर्व गावांची पर्यटनाशी सांगड घालून ग्रामस्थांचा आर्थिकदृष्ट्या विकास व्हावा या दृष्टीने कोकण ग्रामीण पर्यटन समूह आराखडा बनविण्यात आला आहे.हा आराखडा रचना संसद या संस्थेने त्यांच्या अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव करून केला आहे. यासाठी त्यांना कोणतेही वेगळे शुल्क देण्यात आलेले नाही. केवळ त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करण्यात आला होता.या संस्थेने विजयदुर्ग, सावडाव, आचरा, आंबोली, परुळे या पाच गावांना केंद्रबिंदू ठेवून पर्यटनदृष्ट्या समूहांचा अभ्यास करून आराखडा बनविला आहे. यात पर्यावरणपूरक बाबींना जास्त महत्व देण्यात आले आहे. या दृष्टीने लवकरच कामही सुरु करण्यात येईल.यासाठी स्वदेश भ्रमण योजनेंतर्गत ८२ कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील इतरही समूहांचा विचार करण्यात येणार आहे.या योजनांमधून पायाभूत सुविधा निर्माण करणे, लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळवून देणे तसेच कृषीपूरक व्यवसाय व उद्योग यांची साखळी तयार करणे हा उद्देश आहे. यासाठी महिला बचतगटांचीही मोठी मदत लागणार आहे व लोकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.निसर्गाच्या संरक्षणातून लोकांचा विकास यासाठी जास्तीत जास्त उद्दीष्ट्य मिळावे म्हणून प्रयत्न व सूक्ष्म नियोजन यातून आपली शक्तीस्थाने ओळखून शासनाकडून निधी घेतला व त्याचा विनियोग केला तर आपण नक्कीच विकासाचे उद्दीष्ट गाठू शकू असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)केसरकर : त्यावेळी डोळे बंद होते का?चिपी विमानतळाच्या कामावरून आपल्यावर टीका होत आहे. धावपट्टी अडीच किलोमीटरची की साडेतीन किलोमीटरची याबाबत राजकारण करून आपल्यावर टीका केली जात आहे. मात्र या विमानतळासंदर्भातील करारावर सह्या करताना डोळे बंद ठेवले होते का असा सवाल आम्ही विचारला तर चालेल का? पण आम्हांला टीका करायची नाही. कारण केवळ टीकेने विकास होत नाही. विकास हा सहकारातून होऊ शकतो. त्यामुळे मला टीका न करता जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. केवळ टीका करून विकास होत नाही तर टीकेचे उत्तर आपल्या कामातून व लोकांच्या समृद्धीतून दिले गेले पाहिजे, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.