शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणार

By admin | Updated: June 6, 2016 00:50 IST

दीपक केसरकर : जिल्ह्याच्या विकासासाठी हा केवळ ट्रेलर, पिक्चर बाकी आहे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचा आर्थिक विकास साधताना जिल्ह्याचे कोकणपणही जपले गेले पाहिजे. कोकणची शक्ती आपण अद्याप ओळखू शकलेलो नाही. म्हणूनच येथील लोकांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण पर्यटनात सध्या केवळ पाच समूह घेण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण पर्यटन समूह (गाव) या योजनेत समाविष्ट केले जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्ह्याच्या विकासाचा हा केवळ ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.ग्रामीण पर्यटन आराखडा सादरीकरणानंतर ते पत्रकारांशी शरद कृषी भवन येथे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्गचा विकास करताना येथील निसर्ग पाहता पर्यावरणपूरक प्रकल्प निसर्गाची जपणूक व शाश्वत विकास असावा या दृष्टीने या आराखड्यांचे सादरीकरण रविवारी करण्यात आले असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु त्याच्या अंतर्गत अनेक सुंदर गाव आहेत. या सर्व गावांची पर्यटनाशी सांगड घालून ग्रामस्थांचा आर्थिकदृष्ट्या विकास व्हावा या दृष्टीने कोकण ग्रामीण पर्यटन समूह आराखडा बनविण्यात आला आहे.हा आराखडा रचना संसद या संस्थेने त्यांच्या अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव करून केला आहे. यासाठी त्यांना कोणतेही वेगळे शुल्क देण्यात आलेले नाही. केवळ त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करण्यात आला होता.या संस्थेने विजयदुर्ग, सावडाव, आचरा, आंबोली, परुळे या पाच गावांना केंद्रबिंदू ठेवून पर्यटनदृष्ट्या समूहांचा अभ्यास करून आराखडा बनविला आहे. यात पर्यावरणपूरक बाबींना जास्त महत्व देण्यात आले आहे. या दृष्टीने लवकरच कामही सुरु करण्यात येईल.यासाठी स्वदेश भ्रमण योजनेंतर्गत ८२ कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील इतरही समूहांचा विचार करण्यात येणार आहे.या योजनांमधून पायाभूत सुविधा निर्माण करणे, लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळवून देणे तसेच कृषीपूरक व्यवसाय व उद्योग यांची साखळी तयार करणे हा उद्देश आहे. यासाठी महिला बचतगटांचीही मोठी मदत लागणार आहे व लोकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.निसर्गाच्या संरक्षणातून लोकांचा विकास यासाठी जास्तीत जास्त उद्दीष्ट्य मिळावे म्हणून प्रयत्न व सूक्ष्म नियोजन यातून आपली शक्तीस्थाने ओळखून शासनाकडून निधी घेतला व त्याचा विनियोग केला तर आपण नक्कीच विकासाचे उद्दीष्ट गाठू शकू असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)केसरकर : त्यावेळी डोळे बंद होते का?चिपी विमानतळाच्या कामावरून आपल्यावर टीका होत आहे. धावपट्टी अडीच किलोमीटरची की साडेतीन किलोमीटरची याबाबत राजकारण करून आपल्यावर टीका केली जात आहे. मात्र या विमानतळासंदर्भातील करारावर सह्या करताना डोळे बंद ठेवले होते का असा सवाल आम्ही विचारला तर चालेल का? पण आम्हांला टीका करायची नाही. कारण केवळ टीकेने विकास होत नाही. विकास हा सहकारातून होऊ शकतो. त्यामुळे मला टीका न करता जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. केवळ टीका करून विकास होत नाही तर टीकेचे उत्तर आपल्या कामातून व लोकांच्या समृद्धीतून दिले गेले पाहिजे, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.