शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकरांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:29 IST

मोदी जाहिरातदारांचे सरकार असल्याची टीका

कुडाळ : पंतप्रधान मोदींच्या काळात देशात ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर एकट्या महाराष्ट्रात ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी सरकारने मागील नऊ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना एकही पॅकेज दिले नाही, महागाईवर या सरकारचे नियंत्रण नाही, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार आहे. देशात बेरोजगारीचा भस्मासुर वाढला आहे मोदी सरकार जाहिरातदारांचे सरकार असल्याचे टीका अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, विकास सावंत, अभय शिरसाट, चंद्रशेखर जोशी, संतोष मुंज, साईनाथ चव्हाण, सुंदर सावंत, अरविंद मोंडकर, विभावरी सुखी, अमिदी मेस्त्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी ३ हजार ७०० किलोमीटरची पदयात्रा काढली होती याला एक वर्ष पूर्ण झाले. या यात्रेचे संदेश देशभर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी डॉ. भालचंद्र मुंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत विरोधी पक्षाने इंडिया नाव ठेवले म्हणून देशाचे नाव बदलण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही यामध्ये फरक करत २०१४ पासून या देशांमध्ये संसदीय लोकशाहीच्या बुरख्याखाली अध्यक्षीय लोकशाही सुरू केली आहे अशी टीका केली.युवक रोजगाराच्या प्रतीक्षेतरुपयाची किंमत घटली असून महागाई वाढली आहे. त्यामुळे या सरकारचे महागाईवर नियंत्रण नाही. कांद्याचा निर्यातीवरील कर वाढल्याने देशामधील कांद्याची किंमत वाढली आहे. यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागला. महागाईवर या देशाच्या सरकारचे नियंत्रण नाही, तर व्यापाऱ्यांचे या सरकारवर नियंत्रण आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत या सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र देशातील ४१ कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचेही डॉ. मुणगेकर म्हणाले. निवडणुकीला सहा महिने असताना एक देश एक निवडणुकीची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरNarendra Modiनरेंद्र मोदी