शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

ऐन हंगामात शेतकऱ्यांवर काळाचा घाला

By admin | Updated: May 15, 2016 00:18 IST

२० लाखांची हानी : मळगावात काजू, आंबा बागेला आग

तळवडे : मळगाव-कोमोळ तळी याठिकाणी रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या २५ एकर जागेत असणाऱ्या आंबा, काजू बागेस आग लागून २० ते २२ लाख रूपयांची हानी झाली आहे. काबाडकष्टातून फुलविलेली आंबा-काजू, माडाची झाडे ऐन हंगामात क्षणार्धात आगीत होरपळून खाक झाली. ही आग दुपारी एकच्या सुमारास ऐन उन्हाच्या कडाक्यात लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या बागांना अचानक आग लागली. ऐन दुपारच्या कडक उन्हातच ही आग लागल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता बघता ही आग दुरवर विस्तारली. काही कळायच्या आतच आगीचे लोट आकाशात जाऊन शेजारच्या बागांमध्ये आग शिरली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण विस्तारलेल्या आगीने ते कठीण बनले होते. शेवटी सावळवाडा येथील ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील बागांवरील अनर्थ टळला. दरम्यान, या आगीमध्ये मळगावातील शेतकरी श्रीधर गावकर, सोमा गावकर, बबन गावकर, विजय सावळ, द्वारकानाथ सावळ, नंदकिशोर सावळ, रमेश सावळ, प्रशांत राऊळ या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनुर्लेकर, विजय हरमलकर, महेश शिरोडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी आदी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, या आगीने शेतकऱ्यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले असून शासनामार्फत भरपाई देण्याची मागणी पंचक्र ोशीतून होत आहे. (प्रतिनिधी)अश्रू आणि घामाच्या धारा...अनेक वर्षाच्या मेहनतीने उभारलेल्या बागा ऐन हंगामात डोळ्यासमोर क्षणार्धात पेटता पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ही आग विझविण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्यांच्या हातात पाणी होते तर डोळ्यांतून अश्रूंच्या व अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोळ्यासमोरच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होरपळल्याने शेतकरीही हवालदिल झाले होते. हे दृश्य पाहणारेही भावूक झाले होते.