शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ऐन हंगामात शेतकऱ्यांवर काळाचा घाला

By admin | Updated: May 15, 2016 00:18 IST

२० लाखांची हानी : मळगावात काजू, आंबा बागेला आग

तळवडे : मळगाव-कोमोळ तळी याठिकाणी रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या २५ एकर जागेत असणाऱ्या आंबा, काजू बागेस आग लागून २० ते २२ लाख रूपयांची हानी झाली आहे. काबाडकष्टातून फुलविलेली आंबा-काजू, माडाची झाडे ऐन हंगामात क्षणार्धात आगीत होरपळून खाक झाली. ही आग दुपारी एकच्या सुमारास ऐन उन्हाच्या कडाक्यात लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या बागांना अचानक आग लागली. ऐन दुपारच्या कडक उन्हातच ही आग लागल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता बघता ही आग दुरवर विस्तारली. काही कळायच्या आतच आगीचे लोट आकाशात जाऊन शेजारच्या बागांमध्ये आग शिरली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण विस्तारलेल्या आगीने ते कठीण बनले होते. शेवटी सावळवाडा येथील ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील बागांवरील अनर्थ टळला. दरम्यान, या आगीमध्ये मळगावातील शेतकरी श्रीधर गावकर, सोमा गावकर, बबन गावकर, विजय सावळ, द्वारकानाथ सावळ, नंदकिशोर सावळ, रमेश सावळ, प्रशांत राऊळ या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनुर्लेकर, विजय हरमलकर, महेश शिरोडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी आदी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, या आगीने शेतकऱ्यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले असून शासनामार्फत भरपाई देण्याची मागणी पंचक्र ोशीतून होत आहे. (प्रतिनिधी)अश्रू आणि घामाच्या धारा...अनेक वर्षाच्या मेहनतीने उभारलेल्या बागा ऐन हंगामात डोळ्यासमोर क्षणार्धात पेटता पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ही आग विझविण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्यांच्या हातात पाणी होते तर डोळ्यांतून अश्रूंच्या व अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोळ्यासमोरच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होरपळल्याने शेतकरीही हवालदिल झाले होते. हे दृश्य पाहणारेही भावूक झाले होते.