शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: September 17, 2022 16:08 IST

पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाही

कणकवली: शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही देवगड तालुक्यात काम केले. मात्र या कामाची योग्य ती दखल घेतली गेली नाही. खरे पाहता सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत गटतट निर्माण होण्यामागे आमदार वैभव नाईक यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे. कणकवली येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संदेश सावंत-पटेल, सुनील पारकर, शेखर राणे, दिलीप गावकर आदी उपस्थित होते.विलास साळसकर म्हणाले, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००७ पासून देवगड तालुक्यात ५ तालुकाप्रमुख झाले. त्यातील कोण प्रामाणिक राहिले नाहीत. मी मात्र माझा व्यवसाय सोडून प्रामाणिक राहिलो. जे काही शिवसैनिक होते, त्यांना घेऊन काम केले. गेले ५ वर्ष मी नाराज होतो. पदावरुन हटवल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी बोलावे लागेल, असे सांगितले. गेले वर्षभर तक्रारी केल्या आहेत त्यांना व आम्हाला एकत्र बसवा असे सांगितले. त्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत.पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाहीजी प्रतिज्ञापत्र आम्ही केली ती  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या नेत्यांनी नेवून  दिली. २ ऑगस्टला दुधवडकर यांची उपनेते म्हणून निवड झाली म्हणून त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटायला या असे सांगितले. अरुण दुधवडकर यांच्यासोबत तीन तास मी  मातोश्रीवर होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही भेटलो. मात्र, पक्ष प्रमुखांना भेटून देखील मला न्याय मिळाला नाही. म्हणून मी नाराजीने शिंदे गटात सहभागी झालो...त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजयी झालेमी सातत्याने खासदार विनायक राऊत यांना भेटत होतो. मात्र, दोन दोन वेळा भेटून सुद्धा निर्णय होत नसेल तर काय उपयोग ? माझ्याप्रमाणेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आमदार नाईकांविरोधात नाराजी आहे राणेंविरोधात लढताना आम्ही होतो. ते सर्व आता आम्ही चौथ्या, पाचव्या फळीत गेलो. आम्ही ओवाळून टाकलेले कार्यकर्तेच  होतो, त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजय झाले. त्यावेळी गोरीशंकर खोत कुठे होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे.संदेश पारकरांवर आरोपदेवगड नगरंचायतीच्या सत्ताधारी लोकांनी विश्वास गमवला आहे. आम्ही काम केले त्यामुळेच विजय झाला. श्रेय मात्र दुसऱ्याने घेतले. कणकवलीत चमकेश गिरी करणारे नेते देवगडात येत असतात. तर संदेश पारकर यांनी राज्यात सर्वत्र देवगड नगरपंचायत जिंकली म्हणून स्वतः श्रेय घेतल्याचा आरोप विलास साळसकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाKankavliकणकवलीPoliticsराजकारण