शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईकांमुळेच शिवसेनेत गटतट!, शिंदे गटात सामील झालेल्या विलास साळसकरांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: September 17, 2022 16:08 IST

पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाही

कणकवली: शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही देवगड तालुक्यात काम केले. मात्र या कामाची योग्य ती दखल घेतली गेली नाही. खरे पाहता सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत गटतट निर्माण होण्यामागे आमदार वैभव नाईक यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे. कणकवली येथील शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संदेश सावंत-पटेल, सुनील पारकर, शेखर राणे, दिलीप गावकर आदी उपस्थित होते.विलास साळसकर म्हणाले, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००७ पासून देवगड तालुक्यात ५ तालुकाप्रमुख झाले. त्यातील कोण प्रामाणिक राहिले नाहीत. मी मात्र माझा व्यवसाय सोडून प्रामाणिक राहिलो. जे काही शिवसैनिक होते, त्यांना घेऊन काम केले. गेले ५ वर्ष मी नाराज होतो. पदावरुन हटवल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी बोलावे लागेल, असे सांगितले. गेले वर्षभर तक्रारी केल्या आहेत त्यांना व आम्हाला एकत्र बसवा असे सांगितले. त्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत.पक्ष प्रमुखांना भेटून देखील न्याय मिळाला नाहीजी प्रतिज्ञापत्र आम्ही केली ती  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या नेत्यांनी नेवून  दिली. २ ऑगस्टला दुधवडकर यांची उपनेते म्हणून निवड झाली म्हणून त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटायला या असे सांगितले. अरुण दुधवडकर यांच्यासोबत तीन तास मी  मातोश्रीवर होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही भेटलो. मात्र, पक्ष प्रमुखांना भेटून देखील मला न्याय मिळाला नाही. म्हणून मी नाराजीने शिंदे गटात सहभागी झालो...त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजयी झालेमी सातत्याने खासदार विनायक राऊत यांना भेटत होतो. मात्र, दोन दोन वेळा भेटून सुद्धा निर्णय होत नसेल तर काय उपयोग ? माझ्याप्रमाणेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आमदार नाईकांविरोधात नाराजी आहे राणेंविरोधात लढताना आम्ही होतो. ते सर्व आता आम्ही चौथ्या, पाचव्या फळीत गेलो. आम्ही ओवाळून टाकलेले कार्यकर्तेच  होतो, त्यामुळे खासदार विनायक राऊत दोन वेळा विजय झाले. त्यावेळी गोरीशंकर खोत कुठे होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे.संदेश पारकरांवर आरोपदेवगड नगरंचायतीच्या सत्ताधारी लोकांनी विश्वास गमवला आहे. आम्ही काम केले त्यामुळेच विजय झाला. श्रेय मात्र दुसऱ्याने घेतले. कणकवलीत चमकेश गिरी करणारे नेते देवगडात येत असतात. तर संदेश पारकर यांनी राज्यात सर्वत्र देवगड नगरपंचायत जिंकली म्हणून स्वतः श्रेय घेतल्याचा आरोप विलास साळसकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाKankavliकणकवलीPoliticsराजकारण