शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे निगुडे गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:29 IST

अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले

ठळक मुद्देतीन वीज खांब कोसळले : अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ

बांदा : अचानक झालेल्या वादळी अवकाळी पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. निगुडेत झालेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाºयामुळे आंब्याचे झाड कोसळून विजेचे तीन खांब कोसळले. त्यामुळे निगुडे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. यामुळे निगुडे गावाला शनिवारी मध्यरात्री १२.३० नंतर अंधारात रहावे लागले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज वितरणचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने काजू, आंबा, जांभूळ, करवंद, कोकम आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पावसाने काजू पिकावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. महावितरणच्या तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांनी, ग्रामस्थांनी युद्धपातळीवर काम करीत रविवारी सांयकाळी ६.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. शनिवारी दुपारपासूनच वातावरणातील उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. तसेच सायंकाळी ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले.

निगुडे येथे सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे आंब्याचे झाड कोसळून तीन विजेचे खांब कोसळले व गावातील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबतची माहिती मिळताच निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, नारायण राणे आदींनी सहकार्य केले. निगुडेचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून वीज अधिकाºयांना कल्पना दिली. एका छतावर वीज खांब पडल्याने सिमेंटच्या पत्र्यांचे नुकसान झाले. सर्व विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.

विद्युत वितरणला माहितीदिल्यानंतर विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रविवारी कर्मचारी दाखल झाले.रविवारी सकाळी घटनास्थळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी येत सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्वरित याठिकाणी विद्युत खांब उभारण्यात यावेत अशी तातडीची मागणी करण्यात आली.

सध्या एप्रिल महिना म्हणजे उष्म्याचा काळ सुरू आहे. रस्त्यावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करण्यात आले. यावेळी निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, उमेश गावडे, संदीप राणे, पंढरीनाथ राणे, नारायण राणे, दीपक पवार, महेश गावडे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. यावेळी महावितरणचे वायरमन मयेकर, कुडव तसेच लाईनमन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे दीपक निगुडकर आदी उपस्थित होते.

नागरिकांमधून नाराजीयेथील महावितरणचे अभियंता अनिल यादव हे सुटीवर असल्यामुळे तसेच त्यांनी या घटनेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. याठिकाणी जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? त्यामुळे शाखा अभियंता यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली.

वादळी पावसामुळे आंब्याच्या झाडासह विजेचे तीन खांब कोसळून पडल्याने निगुडेतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग