शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:09 IST

मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे.

ठळक मुद्देपुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे नार्वेकर कुटुंबियांसमोर आव्हान

चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे. पुरामध्ये वाहून गेलेले आणि पाण्यात भिजून वाया गेलेले सामान यांचा तपशील काढल्यानंतर सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शंकर नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. एवढे मोठे नुकसान भरून काढून पुन्हा व्यवसाय उभा करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.काळसे बागवाडीमध्ये कर्ली नदीकिनारी शंकर नार्वेकर आणि कुटुंबीयांचा बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या नावाने फायबरच्या व लाकडी बोटी बांधणे व दुरुस्ती करण्याचा व्यवसाय आहे. गेली १२ वर्षे हा व्यवसाय ते करतात या व्यवसायामुळे काही स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजता कर्ली खाडीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आणि नार्वेकर कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या महापुरामध्ये २ नवीन बनविलेल्या रेती बोटी, १९ फुट लांबीचे ६ पगार ( छोट्या होड्या), २७५ नग प्लायवूड, १५२ कॅन रेक्झीन, ५५ मॅट बॉक्स ( रोल ), वेगवेगळ्या आकाराचे ४९ फोम, २५०० घनफूट लाकूड सामान, ५५ फुट लांबीचा फायबर मोल्ड ( साचा ), २ मोडलेले मोल्ड आणि १० बेल्ट एवढे सर्व सामान वाहून गेले तसेच जनरेटर, इलेक्ट्रिक कटर, तसेच इतर मशिन आणि विद्युत उपकरणे पुराच्या पाण्यात भिजून नादुरुस्त झाली.अशाप्रकारे वाहून गेलेले आणि नादुरुस्त झालेले सर्व सामान ४0 लाख रुपये किमतीचे होते अशी माहिती शंकर नार्वेकर यांनी दिली. तर काही सामान वाडीतील तरुणांनी आणि शेजारील सहाकाऱ्यांनी धाडसाने पकडले त्यामुळे काही साहित्य वाहून जाण्यापासून वाचवता आले.

यावेळी संदिप शिंग्रे, सचिन सावंत, अरुण शिंग्रे, संदिप गुराम, पिंट्या परब, ललित खोत, अक्षय घाडी, बबलू खोत, बबलू जावकर, वैभव घाडी, दाजी घाडी, विष्णू नांदोस्कर, आना परब, गुणेश घाडी, विशाल राणे, पिंट्या नार्वेकर, शिवा मेस्ता, सुनिल मेस्ता, वासुदेव मेस्ता, लक्ष्मण माड्ये, नाना खोत, जयेश वाडकर, अरविंद खोत, सचिन खोत, अमित खोत, वासुदेव मेस्ता यांनी मदतकार्य करून काही सामान वाहून जाण्यापासून वाचवले. तरीही एवढे लाखो रुपयांचे नुकसान भरून काढणे ही शंकर नार्वेकर यांच्यासमोरील मोठी समस्या आहे. 

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग