शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:09 IST

मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे.

ठळक मुद्देपुरामुळे फायबर बोट कारखान्याचे ४० लाखांचे नुकसान, काळसे बागवाडीतील प्रकार पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे नार्वेकर कुटुंबियांसमोर आव्हान

चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे. पुरामध्ये वाहून गेलेले आणि पाण्यात भिजून वाया गेलेले सामान यांचा तपशील काढल्यानंतर सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शंकर नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. एवढे मोठे नुकसान भरून काढून पुन्हा व्यवसाय उभा करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.काळसे बागवाडीमध्ये कर्ली नदीकिनारी शंकर नार्वेकर आणि कुटुंबीयांचा बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या नावाने फायबरच्या व लाकडी बोटी बांधणे व दुरुस्ती करण्याचा व्यवसाय आहे. गेली १२ वर्षे हा व्यवसाय ते करतात या व्यवसायामुळे काही स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजता कर्ली खाडीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आणि नार्वेकर कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या महापुरामध्ये २ नवीन बनविलेल्या रेती बोटी, १९ फुट लांबीचे ६ पगार ( छोट्या होड्या), २७५ नग प्लायवूड, १५२ कॅन रेक्झीन, ५५ मॅट बॉक्स ( रोल ), वेगवेगळ्या आकाराचे ४९ फोम, २५०० घनफूट लाकूड सामान, ५५ फुट लांबीचा फायबर मोल्ड ( साचा ), २ मोडलेले मोल्ड आणि १० बेल्ट एवढे सर्व सामान वाहून गेले तसेच जनरेटर, इलेक्ट्रिक कटर, तसेच इतर मशिन आणि विद्युत उपकरणे पुराच्या पाण्यात भिजून नादुरुस्त झाली.अशाप्रकारे वाहून गेलेले आणि नादुरुस्त झालेले सर्व सामान ४0 लाख रुपये किमतीचे होते अशी माहिती शंकर नार्वेकर यांनी दिली. तर काही सामान वाडीतील तरुणांनी आणि शेजारील सहाकाऱ्यांनी धाडसाने पकडले त्यामुळे काही साहित्य वाहून जाण्यापासून वाचवता आले.

यावेळी संदिप शिंग्रे, सचिन सावंत, अरुण शिंग्रे, संदिप गुराम, पिंट्या परब, ललित खोत, अक्षय घाडी, बबलू खोत, बबलू जावकर, वैभव घाडी, दाजी घाडी, विष्णू नांदोस्कर, आना परब, गुणेश घाडी, विशाल राणे, पिंट्या नार्वेकर, शिवा मेस्ता, सुनिल मेस्ता, वासुदेव मेस्ता, लक्ष्मण माड्ये, नाना खोत, जयेश वाडकर, अरविंद खोत, सचिन खोत, अमित खोत, वासुदेव मेस्ता यांनी मदतकार्य करून काही सामान वाहून जाण्यापासून वाचवले. तरीही एवढे लाखो रुपयांचे नुकसान भरून काढणे ही शंकर नार्वेकर यांच्यासमोरील मोठी समस्या आहे. 

टॅग्स :floodपूरsindhudurgसिंधुदुर्ग