शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आंब्यावरील रोगांचे दुष्टचक्र संपता संपेना-- थ्रीप्सचा प्रादुर्भाव कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:38 IST

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत.

ठळक मुद्दे शेतकºयांसमोर पुन्हा आर्थिक संकट - गतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्यावर

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. त्यामुळे आंब्याचा आकार चिकूसारखा झाला आहे. ऋतूचक्रातील बदलामुळे आंबा पिकाला दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीमुळे चांगला मोहोर आल्यानंतर बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आंबा अत्यल्प असल्याने पुन्हा आर्थिक दृष्टचक्राला सामोरे जावे लागणार आहे.

कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. सध्या २५ ते ३० हजार पेटी  विक्रीला येत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक निम्मीच आहे. आंबा कमी आहेच शिवाय दरही घसरलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव राहिला. त्यासाठी हवामानाचा अंदाज घेत शेतकºयांनी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीदेखील केली. 

डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा आला. मात्र, सर्वाधिक थंडीमुळे दुबार मोहोराचे संकट उभे राहिले. फुलोºयाने डवरलेल्या झाडांकडे पाहून शेतकरी समाधानी होते. मात्र, दुबार मोहोरामुळे फळगळ झाली शिवाय थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम पिकावर झाला.  गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादन फारच कमी आहे. एप्रिल सुरू झाला तरी थ्रीप्स हटत नसल्याने शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी नुकसान सहन करावे लागत आहे.

हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शेतकरी सजग झाले आहेत. थ्रीप्स रोग पिकाचे नुकसान करीत असला तरी कीटकनाशकांची फवारणी केल्यास औषधांचा रेसिड्यू फळात उतरण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी फवारणी करणे टाळत आहेत. परंतु, फवारणी न केल्यास थ्रीप्समुळे पिकाची हानीही होत आहे. मात्र, कृषी विभाग निद्रीस्त असून, शेतकºयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा