शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

आंब्यावरील रोगांचे दुष्टचक्र संपता संपेना-- थ्रीप्सचा प्रादुर्भाव कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:38 IST

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत.

ठळक मुद्दे शेतकºयांसमोर पुन्हा आर्थिक संकट - गतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्यावर

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. त्यामुळे आंब्याचा आकार चिकूसारखा झाला आहे. ऋतूचक्रातील बदलामुळे आंबा पिकाला दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीमुळे चांगला मोहोर आल्यानंतर बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आंबा अत्यल्प असल्याने पुन्हा आर्थिक दृष्टचक्राला सामोरे जावे लागणार आहे.

कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. सध्या २५ ते ३० हजार पेटी  विक्रीला येत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक निम्मीच आहे. आंबा कमी आहेच शिवाय दरही घसरलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव राहिला. त्यासाठी हवामानाचा अंदाज घेत शेतकºयांनी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीदेखील केली. 

डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा आला. मात्र, सर्वाधिक थंडीमुळे दुबार मोहोराचे संकट उभे राहिले. फुलोºयाने डवरलेल्या झाडांकडे पाहून शेतकरी समाधानी होते. मात्र, दुबार मोहोरामुळे फळगळ झाली शिवाय थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम पिकावर झाला.  गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादन फारच कमी आहे. एप्रिल सुरू झाला तरी थ्रीप्स हटत नसल्याने शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी नुकसान सहन करावे लागत आहे.

हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शेतकरी सजग झाले आहेत. थ्रीप्स रोग पिकाचे नुकसान करीत असला तरी कीटकनाशकांची फवारणी केल्यास औषधांचा रेसिड्यू फळात उतरण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी फवारणी करणे टाळत आहेत. परंतु, फवारणी न केल्यास थ्रीप्समुळे पिकाची हानीही होत आहे. मात्र, कृषी विभाग निद्रीस्त असून, शेतकºयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा