शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यावरील रोगांचे दुष्टचक्र संपता संपेना-- थ्रीप्सचा प्रादुर्भाव कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:38 IST

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत.

ठळक मुद्दे शेतकºयांसमोर पुन्हा आर्थिक संकट - गतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्यावर

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. त्यामुळे आंब्याचा आकार चिकूसारखा झाला आहे. ऋतूचक्रातील बदलामुळे आंबा पिकाला दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीमुळे चांगला मोहोर आल्यानंतर बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आंबा अत्यल्प असल्याने पुन्हा आर्थिक दृष्टचक्राला सामोरे जावे लागणार आहे.

कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. सध्या २५ ते ३० हजार पेटी  विक्रीला येत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक निम्मीच आहे. आंबा कमी आहेच शिवाय दरही घसरलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव राहिला. त्यासाठी हवामानाचा अंदाज घेत शेतकºयांनी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीदेखील केली. 

डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा आला. मात्र, सर्वाधिक थंडीमुळे दुबार मोहोराचे संकट उभे राहिले. फुलोºयाने डवरलेल्या झाडांकडे पाहून शेतकरी समाधानी होते. मात्र, दुबार मोहोरामुळे फळगळ झाली शिवाय थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम पिकावर झाला.  गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादन फारच कमी आहे. एप्रिल सुरू झाला तरी थ्रीप्स हटत नसल्याने शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी नुकसान सहन करावे लागत आहे.

हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शेतकरी सजग झाले आहेत. थ्रीप्स रोग पिकाचे नुकसान करीत असला तरी कीटकनाशकांची फवारणी केल्यास औषधांचा रेसिड्यू फळात उतरण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी फवारणी करणे टाळत आहेत. परंतु, फवारणी न केल्यास थ्रीप्समुळे पिकाची हानीही होत आहे. मात्र, कृषी विभाग निद्रीस्त असून, शेतकºयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा